केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा- निवृत्त पोलीस अधीक्षक मालोजीराव पाटील

केत्तूर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी निवृत्त पोलीस अधीक्षक मालोजीराव पाटील यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यातील केत्तूरची ग्रामपंचायत निवडणूक लागलेली असून तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत केत्तूर गावचा विकास झाला नसून दोन्ही गावांना पक्के रस्ते नाहीत. गावात राजकीय मत भिन्नता असल्याने गावातील पुढाऱ्यांना तालुक्यातील नेते मंडळी किंमत देत नाहीत. असे असताना प्रभागातील सदस्य वारंवार त्याच त्याच घरातील निवडून येत आहेत. आठवी ते नववी शिक्षण घेतले असल्याने त्यांना कायदे विषयक ज्ञान कमी असल्याने गावचा विकास थांबला असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक ही गावच्या भविष्या दृष्टीने महत्त्वाची असून गावातील युवकांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले आहे त्यास आपला पाठिंबा आहे. कमी शिकलेली प्रतिनिधी न पाठवता जास्तीत जास्त उच्च शिक्षकीत महीलांना येणाऱ्या सदस्या मंडळ मध्ये स्थान द्यावे. मी राहत असलेल्या प्रभाग बिनविरोध करणे साठी प्रयत्न करणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर


