केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक गावच्या विकासासाठी बिनविरोध करा- युवा उद्योजक स्वप्निल राऊत


केत्तूर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक गावच्या विकासासाठी बिनविरोध करा असा मत युवा उद्योजक स्वप्निल राऊत यांनी व्यक्त केले आहे.
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली असून करमाळा तालुक्यातील केत्तूर गाव हे गाव विकासा पासून कोसो दूर आहे. गावाला जोडणारे पक्के रस्ते नसुन गेले दहा वर्षांपासून मी शिक्षण व उद्योग धंद्यामुळे बाहेर गावी फिरत असतो. बाहेरील गावाचां मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. परंतु केत्तूर हे गाव विकास कामांपासून वंचित राहिले आहे याला कारणीभूत येथील नेतृत्व करणारे माणसे आहेत. असे असले तरी येणाऱ्या निवडणूक मध्ये जास्तीत जास्त उच्च शिक्षित महिलांना संधी देऊ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी. या साठी गावातील जेष्ठ, युवक, महिला प्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यावा.
यात सर्व समाजातील लोकांना संधी देण्यात यावी. निवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून गावच्या विकास कामांसाठी 25 लाख रुपये मिळतात. तशा वेगवेगळ्या योजना शासनाच्या आहेत. या विषयी गावातील काही तरुण सहकार्यांनीं पुढाकार घेतला असून मतदारांमध्ये जागृती झाली पाहिजे. तरी याचा सर्व ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी गांभीर्याने विचार करून निवडणूक बिनविरोध करावी असे स्वप्निल राऊत यांनी सांगितले.


- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’ चे कृषी तज्ञ तुषार अहिरे यांनी केले आवाहन
- २३ वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००२ सालच्या बॕच ने केले अनोखे गेट-टू-गेदर
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेऊर रेल्वे येथे वृक्षारोपण
- पोथरे येथील मथुराबाई देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन
- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार दिनेश मडके ‘महाराष्ट्र महागौरव’ पुरस्काराने सन्मानीत