राजुरीच्या तृप्ती साखरे-सरोदे यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिवपदी निवड


करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्याच्या राजुरी गावची कन्या तृप्ती साखरे-सरोदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित दादा गट) प्रदेश सचिव पदी निवड झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते पत्र देऊन निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
राजकारणाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजहिताची कामे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सुरुवातीलाच सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. निवडीनंतर दोन वर्षे सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्या नंतर तृप्ती साखरे-सरोदे यांनी आपल्या सासरी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच परत पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांच्या आरोग्याचे, सुरक्षेचे, बचत गटाचे विविध प्रश्न, विजेचे प्रश्न, एमआयडीसीचे प्रश्न सोडवायला सुरवात केली व यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत महिलांचे संघटन जोडले जाऊ लागले. याचीच दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून तृप्ती साखरे-सरोदे यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली.
सामान्य घरातील कार्यकर्ता ते प्रदेश पातळीवर सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सामान्य लोकांनी, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी व राजुरीकरांनी निवडीचे स्वागत केले.
- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर


