जेऊर : भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी; संभाजी ब्रिगेडच्यावतीने महापुरूषांच्या प्रतिमांचे वाटप


करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमा चिखलठाण वरकटणे व वांगी-1 या तलाठी कार्यालयास प्रतिमा भेट दिल्या तसेच आतापर्यंत 1000 शासकीय कार्यालयास व शासकीय अधिकाऱ्यास भेट देण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा लिहण्याचा व मतांचा अधिकार मिळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत. शिका, संघर्ष करा व संघटित व एकजुटीने कार्य करा असे बाबासाहेबांचे विचार संभाजी ब्रिगेडने तरुणांच्या मनामध्ये रुजवले संभाजी ब्रिगेड मुळे प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये महापुरुषांचे विचार हे घराघरात पोहचत आहेत व आत्ताच्या आधुनिक युगामध्ये बाबासाहेबांचे स्टेटस तरुणांच्या मोबाईल मध्ये दिसत आहेत ते संभाजी ब्रिगेड मुळे.
यावेळी उपस्थित मंडल अधिकारी वळेकर भाऊसाहेब, चिखलठाणचे तलाठी ए.जे.डोणे, एम.वाय.हेड्डे, पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अतुल निर्मळ, विश्वनाथ सुरवसे, रासपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा शारदाताई सुतार, शरद वाघमोडे, रणजीत कांबळे, आजिनाथ माने, सागर बनकर, सुहास शिंदे, पप्पू कांडेकर, अभिजीत म्हमाणे, महेश जगताप, अजित उपाध्ये इत्यादी उपस्थित होते.
