जेऊर रेल्वे गेट बंदला आज बारा वर्षे पूर्ण; माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला पर्यायी भुयारी मार्ग

जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-
17 जानेवारी 2012 रोजी जेऊरचे रेल्वे गेट इतिहास जमा झाले होते, जेऊर रेल्वे गेट बंदला आज बारा वर्षे झाली असली तरी पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग झाला असल्यामुळे जेऊरचा विकास कायम असून जेऊर भुयारी होण्यासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी निधी मंजूर करून आणला होता.
जेऊरमध्ये येथे मध्य रेल्वेचे रेल्वे गेट होते. परंतु दुहेरीकरण आणि रेल्वे गेट मुक्त करण्यासाठी रेल्वे विभागाने गेल्या दहा वर्षांपूर्वी गेट बंद केले. परिणामी जेऊर गावाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले, पर्यायी मार्ग म्हणून जेऊरला उड्डाणपूल बांधण्यात आला परंतु हा पूल गावापासून तीन किमी असल्याने नागरिकांचे हाल होत होते. पूर्वेकडे शाळा, दवाखाने, बाजारपेठ असल्याने पश्चिमेकडील नागरिकांना गावात येण्यासाठी तीन किमी चा प्रवास करावा लागत होता.

परंतु जेऊरवासीयांच्या संघर्षाला तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण आबा पाटील यांनी न्याय मिळवून दिला, आणि व्यव अग्रक्रम समिती मधून जेऊर भुयारी मार्गासाठी आठ कोटी रुपये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुंगुंटीवार यांनी मंजूर केले, त्यामुळे जेऊर रेल्वे गेट मध्ये भुयारी मार्ग सुरू झाला.
भुयारी मार्गामुळे जेऊर परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.




- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर
