जेऊरकरांचे ठरलं, आता माघार नाही.! 21 तारखेला निवदेन; 15 दिवसांत हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही तर रेल रोको


जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
जेऊरकरांचे अखेर ठरलं, आता माघार नाही! 21 तारखेला जेऊर येथील स्टेशन मास्तर यांना हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळविण्यासाठी हजारोंच्या संख्येने निवदेन देण्यात येणार असून हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या हुतात्मा एक्सप्रेस थांब्यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन आहे. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेऊरकरांचा अंत पाहत असून आता माघार नाही असा निर्धार काल जेऊर येथे बैठकीत करण्यात आला.
काल 18 फेब्रुवारीला जेऊर ग्रामपंचायत मध्ये जेऊर प्रवासी संघटनेची बैठक झाली, हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेसला जेऊर स्थानकावर थांबा मिळावा म्हणून या विषयावर चर्चा करण्यात आली. 21 फेब्रुवारीला मंगळवारी सर्वांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालय समोर ठीक सायंकाळी 4.30 वाजता जमा व्हायचे असून शेकडो- हजारों च्या संख्येने मिळून जेऊर स्टेशन प्रबंधाकडे जाऊन निवेदन द्यायचे आहे, हुतात्मा एक्सप्रेसला पंधरा दिवसात थांबा न मिळाल्यास पुढील आंदोलन केले जाईल असे बैठकीत मध्ये ठरले असून ही गाडी थांबली तर करमाळा तालुक्यातील सर्व लोकांना दळणवळणासाठी उपयोगी असेल, व्यापार व व्यवसायात वाढ होईल व प्रवाशांची होणारे हाल थांबतील.
वरीलप्रमाणे दिलेला मेसेज वाचून प्रत्येकांनी इतरांना सांगून प्रत्येक गावातून करमाळा शहरातून महिला सहित येऊन सहभागी झाल्यास शंभर टक्के गाडी थांबेल.आपल्या जवळच्या आवडत्या नेत्यांना गाडी थांबवण्याची विनंती प्रत्येक वेळी करा.. व आपापल्या ग्रामपंचायत सदस्यांना सांगून ग्रामपंचायतचे जेऊरला गाडी थांबण्याचे ठराव पत्रक जेऊरला सुहास सूर्यवंशी 8482938989 पोस्ट ऑफिसचे शेजारी किंवा भूषण जनरल स्टोअर्स जेऊर यांच्याकडे पोहोच करावे. कृती करण्याची वेळ आली आहे. सहभागी व्हा. गाडी थांबवा. आपला तालुका अत्यंत जागृत तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. आज प्रत्यक्ष सहभागाची गरज आहे सर्वांनी नक्की या.
जेऊर प्रवासी संघटना, जेऊर

