06/06/2025

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

0
image_editor_output_image650925020-1746297853265.jpg

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त करताना आदिनाथ माने म्हणाले की, महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला महात्मा बसवेश्वर यांचा संत परंपरेचा धौर बारसा लाभला आहे. त्यांचा सामाजिक समतेवर विश्वास होता. त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव उन्नती हक्क जातिभेद सामुदायिक विवाह समाजात अस्पृश्यता प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य सर्वांगीण विकास क्षेत्रात उन्नती यांचा अंगीकार केला होता. त्यांचा बालविवाहास विरोध होता आणि विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांनी मान्यता दिली.

देवाला यापेक्षा देहालयाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करणाने संत म्हणून महात्मा बसवेश्वराकडे पाहिले जाते. बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगलेबर बागेवाडी या गावी ११०५ मध्ये झाला. मध्ययुगातील भारताच्याधार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून महात्मा बसवेश्वरांची ओळख अवध्या देशाला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणे अहंकाराचा नाश करणे ही त्यांची प्रतिज्ञा होती. बसवेश्वर हे गरिबांचे कैवारी होते. आपली संपत्ती लोकसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरवले होते. समता है तत्च त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र होते. आपण जे कमवतो त्यात ईबराचा वाटा आहे. म्हणून त्यातील दिन दुःखीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला होता असे ते म्हणाले.

तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर सोमनाथ जाधव, म्हणालेअंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील, आबा झाडे, किशोर कदम, अतुल निर्मळ, धन्यकुमार गारुडी, सागर बनकर, आदिनाथ माने उमेश मोहिते, अजित उपाध्ये आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page