08/06/2025

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने भगवान महावीर स्वामी यांना अभिवादन

0
IMG-20230404-WA0045.jpg

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी शितपेय व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, भगवान महावीर यांचे अहिंसा आणि अपरीग्रह या दोन महान मानवी मुल्यावर सकल जैन धर्मियांचे विचार मानव जातीला दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शक आहेत. सुखी समाधानी जीवन ही प्रत्येकाची आकांक्षा असते व त्यासाठी सुख साधनाची आवश्यकता असते. भगवान महावीरांचा दुसरा महत्त्वाचा विचार हा अत्यंत मुलगामी व अहिंसा सर्व स्तरावर स्वीकारण्यावर भर देतो असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पल्लवी शिंदे, राणी पाटील, प्रियंका खटके, मिनाक्षी पाटील, नितीन खटके, बालाजी गावडे, राकेश पाटील, अतुल निर्मळ, सुहास पोळ, हेमंत शिंदे, पिंटू जाधव, निलेश पाटील, आदिनाथ माने, सुहास शिंदे, रणजित कांबळे, धन्यकुमार गारुडी, पप्पू कांडेकर, अभिजीत म्हमाणे, शिवप्रताप खटके, बाळासाहेब घाडगे, संदिपान माने, वैभव मोहिते इत्यादी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page