06/06/2025

यशकल्याणी सेवाभवन येथे कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना ; प्रा. गणेश करे-पाटील यांचा सैनिक मित्र पुरस्काराने सन्मान

0
IMG-20240728-WA0009.jpg

करमाळा, दि. २८ (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील यशकल्याणी सेवाभवन येथे कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना देण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांना सैनिक मित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

जगातले सर्वांत उंचीवर लढलेले गेलेले युद्ध म्हणजे कारगिल युद्ध होय. भारतीयांचा विश्वास घात करून पाकिस्ताने घुसखोर कारगिल मध्ये घुसवत काराकोरम महामार्गावर नियंत्रण मिळवून सियाचीन भारतापासून तोडण्याचा प्रयत्न पाकिस्ताने केला होता. मात्र, भारतीय सैनिकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे युद्ध लढून पुन्हा भारतीय चौक्या मिळवल्या. या युद्धाला आज २५ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने करमाळा तालुक्यात आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा व यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.गणेश करे-पाटील यांनी शहिदांना मानवंदना देत वीर माता, वीर पिता आणि वीर पत्नी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत भारतीय सैनिकांच्या शौर्याचे जयगान केले.

सैनिकांसाठी सेवाभावी काम केल्यामुळे प्रा.गणेश करे-पाटील यांना सैनिक मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच योद्धा करिअर अकॅडमीचे सुभेदार मेजर विलास नाईकनवरे, माजी सैनिक सुरेश आदलिंग, शिवाजी भंडारे, पत्रकार गजेंद्र पोळ, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, कृषी सहाय्यक पदी निवड झालेली अश्विनी कुंभार, माजी सैनिक रुग्णवाहिका साजिद शेख, पोलीस दलात निवड झालेले श्रीनाथ उदमले, मेजर मनेश पाटील, नाईक सुभेदार बोलभट साहेब यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विचारपीठावर सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, अॕड बाबुराव हिरडे, मेजर अक्रुर शिंदे, मेजर डोंगरे, मेजर
शहिद मेजर अमोल निलंगे यांचे वडील अरविंद निलंगे आणि आई अंजली निलंगे, सचिन गात, पोलीस अधिकारी पवार साहेब, कृषीभुषण नानासाहेब साळुंके, वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे, संतोष कांबळे, रूग्णसेवक विकी मोरे, ज्ञानेश्वर धनके, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व वीर पत्नी, शहीद पत्नी, वीर माता, वीर पिता, व मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले.

यावेळेस साजिद शेख यांनी सुरू केलेल्या माजी सैनिक सेवा रूग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन सी सी विभागाचे विद्यार्थी यांना सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.योद्धा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे भाऊसाहेब माने, दिगंबरराब साळुंके, प्रा.राम काळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर अक्रुर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन माया भागवत व मेजर किरण ढेरे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page