मांगी परिसराचा दुष्काळी कलंक खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पुसावा- नितीन झिंजाडे


करमाळा, दि. 2 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील मांगी तलाव कुकडी प्रकल्पात समाविष्ट करून या परिसराचा दुष्काळी कलंक खासदार रणजितसिंह नाईक यांनी पुसावा अशी आग्रही मागणी भाजपचे नितीन झिंजाडे यांनी केली आहे.
मांगी तलाव लाभधारक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची खासदार निंबाळकर यांच्यासोबत पुण्यात बैठक भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यावेळी ते बोलत होते.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, मांगी तलावाच्या पाण्यावर अनेक निवडणुका लढवल्या गेल्या आहे. परंतु एकाही लोकप्रतिधीने हा प्रश्न सोडवला नाही. माढा लोकसभेचे प्रतिधित्व अनेक दिग्गज लोकांनी केले आहे त्यांनीसुद्धा हा प्रश्न सोडवला नाही. मांगी तलाव कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याची अनेक वर्षाची मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण करावी व या भागाचा दुष्काळी हा कलंक कामस्वरूपी पुसावा अशी मागणी झिंजाडे यांनी केली आहे.


