लोकनेते स्व. दिगंबरराव बागल कृषी महोत्सव : चिखलठाण येथील दत्तात्रय पाटील यांचा आदर्श ऊस उत्पादक शेतकरी पुरस्काराने सन्मान


चिखलठाण, दि. 12 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील चिखलठाण-1 येथील प्रगतशील बागायदार दत्तात्रय (नाना) भाऊराव पाटील यांना आदर्श ऊस उत्पादक शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.
करमाळ्यात लोकनेते स्व. दिगंबरराव मामा बागल यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कृषी महोत्सवात श्री पाटील यांना सपत्निक सन्मानीत करण्यात आले. श्री पाटील यांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करीत एक एकरात 130 टन ऊसाचे उत्पन्न घेतलेले असून चिखलठाण परिसरातील हा एक रेकॉर्ड केलेला आहे. दत्तात्रय पाटील हे पाठबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत.
यावेळी भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील, मोहोळचे बाळराजे पाटील, विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे, संचालिका रश्मी बागल, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल आदी उपस्थित होते.

