करमाळ्यातील एकलव्य आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा विकास साधणारे केंद्र- प्रा. गणेश करे-पाटील


करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)
एकलव्य आश्रमशाळेच्या माध्यमातून गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळत आहे. भविष्यात प्रगतीच्या वाटेवर चालणारे विद्यार्थी घडविणारे शिक्षण आश्रमशाळेतून मिळत असून आश्रमशाळा वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा विकास साधणारे केंद्र ठरली आहे. असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी केले आहे.
येथील भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संचलित एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी यशकल्याणी संस्थेच्या वतीने प्रा. गणेश करे – पाटील व शितलताई करे – पाटील यांनी आश्रमशाळेस दोन स्मार्ट टी. व्ही. संच भेट दिले गेले. त्याप्रसंगी प्रा. करे-पाटील हे बोलत होते.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी लोंढे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे, आश्रमशाळेचे संस्थापक रामकृष्ण माने, मार्गदर्शिका स्वातीताई माने, डॉ. रोहन जाधव – पाटील, डॉ. शिवानी जाधव – पाटील, विवेक येवले, ह. भ. प. रामचंद्र काळे, माधुरी परदेशी, स्वाती अभिमन्यू माने, जुन्या काळातील नामवंत मल्ल बळीराम माने, उद्योजक संतोष कुलकर्णी, महावीर शहा, प्रकाश माने, आशिष गायकवाड, धनंजय शिंदे, किसन कांबळे, देवळालीचे सरपंच गहिनीनाथ गणेशकर, उपसरपंच अर्चना शिंदे, सदस्य पोपट बोराडे, नलिनी जाधव, शकील बागवान आदी उपस्थित होते. सदरप्रसंगी आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी बहारदार समुहनृत्य, गीत गायन, नाटिका सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी विधवांना सन्मान मिळण्यासाठी कायदा व्हावा यासाठी विशेष पाठपुरावा करणारे प्रमोद झिंजाडे, शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रा. गणेश करे-पाटील, डॉ. रोहन जाधव-पाटील यांचे विशेष सन्मान आश्रमशाळेच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते झिंजाडे यांनी आश्रम शाळेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. पुढे बोलताना प्रा. करे – पाटील यांनी, माने आणि झिंजाडे यांचे सामाजिक कार्य वेगळ्या उंचीचे आहे. माने यांनी उभारणी केलेली आश्रमशाळा भविष्यातील गुणी यशवंत तयार करेल. शाळेला सतत सहकार्य केले जाईल. असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन स्वातीताई माने यांनी केले. आभार मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक भास्कर वाळुंजकर, किशोरकुमार शिंदे, विलास कलाल, विद्या पाटील, विठ्ठल जाधव, प्रल्हाद राऊत, कुमार पाटील, अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उमेश गायकवाड, सैदास काळे, वंदना भालशंकर, दिपाली माने आदींनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी विशाल घोलप, सिद्धार्थ वाघमारे, प्रा. शितल वाघमारे, ज्योती गायकवाड, प्रा. कल्याणराव साळुंखे, संतोष गायकवाड, महेश वैद्य, सतीश फंड, आकाश वाघमारे, विलास चव्हाण, दादा भोसले, नागेश माने, लता विटोरे, रुपाली भोसले, प्रदीप लोखंडे, सुनील हिवाळे, अमोल शिंदे, शोभा राऊत, संजय काळे, लखन गायकवाड, मंगल गायकवाड, पांडुरंग शिंदे, चंद्रकांत काळे आदींसह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

