08/06/2025

जेऊर-चिखलठाण-कुगावं रस्त्याच्या मागणीसाठी जनतेवर उपोषणाची वेळ येणे ही दुर्देवी बाब ; सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवण्याची गरज- दिग्विजय बागल

0
IMG-20240723-WA0015.jpg

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणा सारखे प्रश्न सध्याच्या काळात सुटू शकले नाहीत ही वस्तुस्थिती असून हे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात रश्मी बागल यांच्यासारख्या प्रतिनींधीनां विधानसभेत पाठवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी शेटफळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेटफळ येथील प्रगतिशील शेतकरी कैलास लबडे होते. पुढे बोलताना बागल म्हणाले की, तालुक्यातील महत्वाच्या चार पाच गावांना जाणाऱ्या जेऊर ते कुगावं या रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांवर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. मध्यंतरीच्या काळात तालुक्यात ठोस एकही काम होऊ शकलेले नाही साधे साधे किरकोळ प्रश्नही सुटू शकत नाहीत. करमाळा तालुक्यातील सामान्य लोकांबद्दल आस्था असणाऱ्या सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने आशा नेतृत्वाची गरज तालुक्यात निर्माण झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून आज रश्मी बागल तालुक्याचे महत्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मकाई साखर कारखान्यासमोरील अडचण दूर झाली असून ऊस वहातूकदारांसह उर्वरित देणी लवकरच दिली जातील मकाईच्या गाळप क्षमतेचा विस्तार केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना बागल म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या कार्यकर्ता मेळाव्यांना तालुक्यातून उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून अनेक दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा आमच्याकडे सक्रिय होत आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर पोळ यांनी केले तर आभार मकाईचे माजी संचालक किरण पोळ यांनी मानले.

यावेळी मकाईचे संचालक दिनकर सरडे, वांगी सोसायटीचे माजी चेअरमन विजय रोकडे, रामवाडीचे माजी सरपंच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संतोष वारगड यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मकाईचे संचालक रामभाऊ हाके नवनाथ बागल बापूराव चोरमले, रेवन्नाथ निकत, आमोल यादव, अशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर, गणेश तळेकर, विलास काटे यांच्यासह बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, रंगनाथ शिंदे, मकाईचे माजी संचालक सुरेश पोळ, अविनाश वळेकर, शेटफळचे माजी सरपंच मुरलीधर पोळ, सुनील पोळ, सुभाष पाटील, नानासाहेब पोळ, राजेंद्र गुंड, शंकर पोळ, विजय लबडे, गणेश मोरे, भाऊसाहेब निंबाळकर, महावीर निंबाळकर, साहेबराव पोळ, संभाजी पोळ, महेश घोगरे यांच्यासह या परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

शेटफळ येथील मेळाव्यात करमाळा तालुक्यातील रामवाडी गावचे माजी सरपंच व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संतोष वारगड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रणित बागल गटात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचा व सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा दिग्विजय बागल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page