08/06/2025

दहिगावं उपसा सिंचन योजनेला स्व. दिगंबरराव बागल यांचे नाव द्यावे- अतुल पोळ यांची मागणी

0
IMG_20240206_115807.jpg

करमाळा, दि. ७ (करमाळा-LIVE)-
दहिगावं उपसा जलसिंचन योजनेस स्व.दिगंबर बागल मामा यांचे नाव द्यावे अशी मागणी शेटफळ येथील आदरांजली कार्यक्रमात अतुल पोळ यांनी केली आहे.

दहिगावं उपसा जलसिंचन योजनेचे संकल्पकर्ते आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर जिद्दीने परिश्रम करणारे स्व. दिगंबररावजी बागल मामा यांचे नाव दहिगावं उपसा सिंचन योजनेला देण्यात यावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन अतुल पोळ यांनी केले आहे. शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात मंत्रीपदाला लाथ मारून स्व दिगंबर मामा बागल यांनी तालुक्यातील पूर्व भागला वरदान ठरणारी ही योजना मंजूर करून घेतली. आज कुंभेज, वरकटणे, सौंदे सरफडोह गावातील केळीच्या बागा पाहील्यानंतर मामांच्या दुरदृष्टीची जाणीव होते या योजनेला त्यांचे नाव दिल्याने त्यांच्या कामाचा गौरव होईल त्यामधून त्याचे स्मरण होईल. यामध्ये कोणतीही राजकारण न आणता सर्वांनी मोठ्या मनाने हा निर्णय घ्यावा यासंदर्भात आपण सर्व‌ लोकप्रतिनीधी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना यासंदर्भात मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्व. दिगंबर रावजी बागल मामा यांच्या पुण्यतिथी निमित्त शेटफळ येथे आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी स्व. दिगंबररावजी बागल मामांच्या कार्यावर वर प्रेम असणाऱ्या असंख्य लोकांची ही इच्छा असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page