करमाळा तालुक्यातील नऊ गावांमधील कोतवालच्या जागेसाठी आरक्षण जाहीर- 6 आॕगस्टला परिक्षा



करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील नऊ गावांमधील कोतवाल पदासाठी 6 आॕगस्टला परिक्षा तर 9 आॕगस्टला निकाल लागणार आहे. यामध्ये चिखलठाण, केत्तूर, विहाळ, कात्रज, पांडे, टाकळी, मलवडी, पारेवाडी, कंदर या गावांचा समावेश आहे.
नऊ गावांमधील कोतवाल पद नियुक्ती साठी जात प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
कोतवाल पदासाठी गावनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे-
1) चिखलठाण- भ.ज (ड)
2) केत्तूर- सर्वसाधारण महिला (ओपन महिला)
3) विहाळ- सर्वसाधारण (ओपन)
4) कात्रज- ओबीसी
5) पांडे- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
6) टाकळी (रा)- सर्वसाधारण (ओपन)
7) मलवडी- सर्वसाधारण (ओपन)
8) पारेवाडी- ओबीसी महिला
9) कंदर- अनुसुचीत जमाती
दरम्यान कोतवाल भरतीसाठी दि.24 जुलै ते 31 जुलै कार्यालयीन वेळेत सुट्टी वगळून अर्ज वाटप व स्विकारले जातील तसेच परीक्षा शुल्क आरक्षित प्रवर्गासाठी 300 रुपये व खुला प्रवर्गासाठी 500 रुपये तर अर्जाची छाननी दि.1 ऑगस्ट रोजी, पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे 2 ऑगस्ट रोजी, परीक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी 50 प्रश्नांची लेखी परीक्षा असून दि .6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या परिक्षा पार पडणार आहेत. दि .9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 नंतर उमेदवारांची निवड यादी तहसील कार्यालयातील बोर्डावर लावण्यात येईल असे जाहिरात मध्ये नमूद केलेले आहे.
कोतवाल पदासाठी शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण असावा, तसेच तो संबंधीत सजामधील रहिवाशी असणे आवश्यक आहे. जागा ज्या प्रवर्गासाठी राखीव आहे, त्या प्रवर्गाचे उमेदवार असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय जाहिरनामा प्रसिध्दे केल्याच्या दिनांकापासून 18 पेक्षा कमी व 40 पेक्षा जास्त असू नये. अर्ज उमेदवारांनी स्वत: हजर राहून सादर करावा. 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 50 प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानुसार गुणवत्तेप्रमाणे निवड करण्यात येईल. राखीव जागेवर अर्ज भरणारांनी सक्षम अधिकार्याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. नियुक्तीच्यावेळेस जात प्रमाणपत्राची मुळ प्रत सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झालेली नसावी. तसेच पोलीस प्रशासनाचा चारित्र्य दाखला सादर करणे आवश्यक आहे. कोतवाल पदावर काम करणेस सक्षम असलेचा आरोग्य अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक केंद्र येथील वैद्यकीय अधिकार्यांचा दाखला जोडणे आवश्यक,अर्जदाराने अर्जात खोटी अगर चुकीची माहिती सादर केल्यास झालेली नियुक्ती रद्द करण्यात येईल. अर्जदारास दि.28 मार्च 2005 व तद्नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास तो अपात्र राहील. कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्याने दरमहा शासनाच्या नियमानुसार मानधन देय राहील. नियुक्ती झालेनंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. सदरची भरती प्रक्रिया तालुका निवड समितीचा व जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम राहिल. अर्जदाराने अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत. शैक्षणीक पात्रतेच्या कागदपत्राची सत्य प्रत. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखल्याची सत्य प्रत, जातीच्या प्रमाणपत्राची सत्य प्रत, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे (एनसीएल) नॉनक्रिमेलियर प्रमाणपत्राची सत्य प्रत (महिलासह), स्वत:चे पासपोर्ट आकाराचे काढलेले तीन फोटो अर्जावर डकविणे, तसेच अर्जावर दहा रुपये कोर्ट फी स्टॅम्प आवश्यक आहे.



