07/06/2025

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0
IMG-20250416-WA0018.jpg

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी आदिनाथ माने यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना सागर बनकर म्हणाले की, जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक राजनीतिक धार्मिक अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली. बाबासाहेबांच्या आशा महान युगप्रवर्तक क्रांतिकार, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासुर्य बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार भारतरत्न , डॉ.भीमराव रावजी आंबेडकर व संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा लिहण्याचा व मतांचा अधिकार मिळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशसंपादन केले त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत शिका, संघर्ष कराव संघटित व एकजुटीने कार्य करा असे बाबासाहेबांचे विचार संभाजी ब्रिगेडने तरुणांच्या मनामध्ये रुजवले संभाजी ब्रिगेड मुळे प्रत्येकतरुणाच्या मनामध्ये महापुरुषांचे विचार हे घराघरात पोहचत आहेत.

यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील,अतुल निर्मळ, किशोर कदम, आदिनाथ माने, पिंटू जाधव, सागर बनकर, सागर कोठावळे, सागर साखरे, उमेश मोहिते, अजित उपाध्ये, अविनाश घाडगे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page