08/06/2025

शेटफळ: शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय व उद्योगात उतरण्याची गरज;भालचंद्र पाठक

0
IMG-20221219-WA0009.jpg

जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय व उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध आहेत धाडस व कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यशस्वी होऊ शकतात आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मुलांनी विविध क्षेत्रातील माहिती घेऊन वेगवेगळ्या उद्योग व व्यवसायात धाडसाने उतरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक भालचंद्र पाठक यांनी शेटफळ तालुका करमाळा येथे नागराज ठिबक कंपनी शुभारंभ व दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल पाटील महाराज व ॲड बाबुराव हिरडे उपस्थित होते.

पुढे बोलताना पाठक म्हणाले की शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विषमुक्त शेती पिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेती करणे दिवसोंदिवस अवघड होत चालले आहे आता शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीबरोबरच पुरक व्यवसाय उद्योग सुरू करणे ही काळाची गरज आहे संदर्भात शेटफळ येथील तरूणांचा आदर्श इतर गावातील तरुणांनी घेण्याची गरज आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी शेतकऱ्यांपुढील विविध समस्येसाठी शेतकऱ्यांनीच उत्तरे शोध दिली पाहिजेत आणि संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. लोकविकास डेअरीचे दीपक आबा देशमुख यांनी शेतकऱ्यांची जी मुले नवीन व्यवसाय उद्योग करू इच्छित आहेत त्यांना वडीलांनी व सर्व घरातील मंडळींनी प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी शेटफळ येथील तरुणांनी गट शेतीच्या माध्यमातून एकत्र येऊन विविध व्यवसाय उद्योग व्यवसाय उभारत आहेत याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना होत असून तालुक्यातील इतर गावातील तरुणांनी याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले अध्यक्ष स्थानावरून बोलताना भालचंद्र पाठक सर यांनी शेती पिकवताना शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून विषमुक्त शेती पिकवण्याचा ध्यास घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार वैभव पोळ यांनी मानले या कार्यक्रमाला ॲड बाबुराव हिरडे,सरपंच विकास गुंड, विठ्ठल पाटील महाराज, सनदी लेखपाल विकास वाघे, केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल पाटील, लोकविकास डेअरीचे दीपक देशमुख, महेंद्र पाटील, पत्रकार अशोक मुरूमकर, मकाईचे माजी संचालक किरण पोळ, आदिनाथचे माजी संचालक सुरेश पोळ, कैलास लबडे, विलास लबडे, नानासाहेब साळुंखे, प्रशांत नाईकनवरे, विष्णू पोळ, राजेंद्र साबळे, विजय लबडे यांच्यासह या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page