आदिनाथ कारखान्याबाबत निश्चित मार्ग निघेल ; आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून कारखाना ऊर्जितावस्थेत येईल- प्रा.अर्जूनराव सरक

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
श्री आदिनाथ कारखान्याबाबत मार्ग निश्चित निघेल, आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून कारखाना ऊर्जितावस्थेत येईल असा विश्वास पाटील गटाचे मार्गदर्शक तथा रणनितीकार प्रा अर्जूनराव सरक यांनी व्यक्त केला.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनलला भरगोस यश मिळाल्यानंतर आज आमदार नारायण आबा पाटील यांनी कारखाना कार्यस्थळी असलेल्या श्री आदिनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर नुतन संचालक मंडळासह त्यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आदिनाथ कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले व आशीर्वाद घेतला.
यानंतर कामगारांच्या वतीने नुतन संचालक मंडळास गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर आमदार नारायण आबा पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा असल्याने स्वागत करण्यासाठी नियोजित कार्यक्रमास रवाना झाले यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील गटाचे मार्गदर्शक सरक सर यांनी सांगितले की आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी आपली भुमिका चांगल्या प्रकारे निभावल्याने सहज विजय संपादन करता आला.
आमदार नारायण आबा पाटील यांची स्वच्छ प्रतिमा आणि जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध असण्याची कार्यपद्धती विधानसभा निवडणुकी नंतर या निवडणुकीत सुध्दा कामी आली. ही निवडणुक सुरु झाल्यापासून सर्व काही पुरक वातावरण निर्माण झाले होते. प्रचार यंत्रणा अतिशय प्रभावी पणे राबवली गेली. तसेच पॅनलचे चिन्ह सभासदा पर्यंत पोहचवण्याची यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहिल्याने कपबशी हे पॅनलचे चिन्ह सभासद मतदारांपर्यत इतक्या कमी कालावधीत पोहचले. जगताप व बागल गटाचा मिळालेला पाठींबा उपयोगी पडला. आता आदिनाथ कारखान्यास उर्जीत अवस्थेत आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सकारात्मक घटना घडतील. परंतू तुर्तास जमिन स्तरावरील सभासदांनी दाखवलेला विश्वास नुतन संचालक मंडळाचे आत्मबळ वाढविण्यासाठी कामी येईल असेही प्रा अर्जूनराव सरक यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत करण्यात आलेले अचुक नियोजन व त्यात मिळालेले यश पाहता आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी फार असे वेगळे काही डाव आखावे लागले नसल्याचेही प्रा सरक यांनी बोलून दाखवले. यावेळी नुतन संचालक डॉ हरिदास केवारे, दत्तात्रय गव्हाणे, श्रीमान चौधरी, महादेव पोरे, रविकिरण फुके, दशरथ हजारे, वसंत अंबारे, नवनाथ झोळ, देवानंद बागल, डॉ अमोल घाडगे, विधीज्ञ राहुल सावंत, दत्ताबापु देशमुख, विजय नवले, महेंद्र पाटील, दादासाहेब पाटील, राजाभाऊ कदम, रामेश्वर तळेकर यासह राजन (अण्णा) पाटील, अमरजितसिंह साळुंके, पंडीत वळेकर, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, सरपंच पृथ्वीराज पाटील, गोपाळ मंगवडे, सरपंच सागर पोरे, विधीज्ञ दिपक देशमुख, काकासाहेब पाटील, राहुल गोडगे, बाबासाहेब कोपनर, संतोषबापू पाटील, संतोष कोपनर, उमरडचे माजी सरपंच दादासाहेब पाटील , पैलवान विजय गुटाळ,पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आदि उपस्थित होते.