06/06/2025

मोबाईल मुळे नणंद-भावजय यांच्या नात्यात दुरावा: फोन कोणी करायचा ईगो येतोय आडवा; नणंद-भावजय चे नाजूक नाते जपणे गरजेचे

0
IMG-20230101-WA0050-1-1.jpg

जेऊर, दि. १४ (गौरव मोरे)-
संसारात अनेक नाते-गोते असते, नवरा-बायको, सासू-सुन, दीर-भावजय तसेच नणंद-भावजय, होय असे म्हटले जाते की नणंद-भावजय यांचे नाते म्हणजे बहिणी-बहिणी चे नातं.

नणंद-भावजय यांचे नातं खूपच महत्त्वाचे आहे. पूर्वी नणंद-भावजय ह्या एकमेकांशी समजून घेत, अडचणी, सुख, दुःखात एकमेकांना समजून घेत तर नणंद माहेरी आली तर तिला भावजय आदराने वागवत असायची. परंतु काळ बदललेला आहे. डिजिटल युगात ईगो आडवा येत आहे. मोबाईल च्या आधुनिकीकरण मुळे नणंद-भावजय यांचे नात्यात दुरावा वाढत आहे. फोन कोणी करायचा तू-की-मी या ईगो मुळे मन दुखावले जात असून नणंद-भावजय या नाजूक नात्यात गैरसमजाचे भूत वाढतच जात आहे. या गैरसमज आणि ईगो मुळे बिचाऱ्या भावांचे मात्र हाल होताना पहायला मिळत आहे.

घरगुती वादांमुळे मानसिक दृष्ट्या नणंद-भावजय या दोघींनाही नैराश्‍य येत आहे. यातूनच कलह वाढताना दिसत आहे, नणंद-भावजय यांनी एकमेकिंना समजून घेणे आवश्‍यक आहे. फोन करण्यावरून किरकोळ कारणावरून वाद घालू नये. आहे त्या परिस्थितीमध्ये सुखाने संसार करणे गरजेचे असून त्याच बरोबर नणंद मुलीनेही आपल्या भावजयशी समजून घेणे गरजेचे आहे. कुठे चुका होत असतील तर लहान बहिण समजून माफ करून घेणे गरजेचे आहे.

नणंद-भावजय या दोघींनाही माहेर तसेच सासर आहेच, दोघींच्या संसारात थोडे गैरसमज तसेच छोटे-मोठे भांडणे झाली तरीही चालेल पण जर डोके शांत ठेवायला पाहिजे संयम सुटणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, आपला अहंकार बाजूला ठेवून तसेच आपली तत्व बाजूला किंवा मोडली तरी काही फरक पडत नाही, एकमेकांशी भांडणे सुरू असताना शक्यतो जास्तीत जास्त शांत राहावे आणि दुसऱ्याला जास्त बोलून द्यावे म्हणजे आपल्याला आपोआप मुद्दे सुचतात. वाद वाढवण्यापेक्षा शक्यतो, वाद कमी करावा, आवाज न वाढवता दुसऱ्याला निरुत्तर करावे. मात्र आपण बोलायाला सुरवात करण्यापूर्वी दुसऱ्याला शांत बसून ऐकण्यास सांगावे म्हणजे पाहुणे-रावळे आणि शेजाऱ्यांची करमुक्त करमणूक सुद्धा होणार नाही.

मोबाईल फोन आल्यामुळे नात्यात दुरावा आला आहे यासाठी फोन कुणालाही करावा लागला तरी ईगो आडवा येऊ देऊ नये. एकमेकिंना समजून घेऊन या नाजूक नात्याला मजबूत बनवायाला हवे.

कृपया नोंद घाघ्या सदरील लेख आजूबाजूला घडलेल्या घटनांच्या तसेच घडामोडींच्या आधारे लिहिलेला आहे. आपला काही संबंध आल्यास योगायोग समजावा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page