दहावी-बारावीच्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाच्या नव्या पॕटर्नमुळे विद्यार्थी दडपणाखाली ; निर्णयाचा फेरविचार व्हावा

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी-बारावी परिक्षा काॕपी मुक्त होण्यासाठी कर्मचारी अदलाबदली चा घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी दडपणाखाली आलेले असून याचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव बापू निळ यांनी केली आहे.
ऐन दहावी-बारावी परीक्षा काळात बोर्डाच्या अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दहावी बारावी चे विध्यार्थी प्रचंड दडपणा खाली असून विध्यार्थी यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे याला जबादार कोण ? अशी चर्चा पालक आणि विध्यार्थी व शिक्षक यांच्यातच होत आहे.
कॉपी मुक्तीला विरोध नाही तर पाठिंबा आहे पण कर्मचारी बदलीला विरोध आहे कारण केंद्र संचालक आणि परिवेक्ष एका गावातून दुसरीकडे जाणार असल्यामुळे मूळ शाळेतील शाळा वर्ग कोण घेणार.? केंद्रात परीक्षा ला सुरक्षित मुलांना कोण घेऊन जाणार ? पेपर तपासणी चे काम कोण करणार? यामुळे त्या वर्गतील विध्यार्थी चे नुकसान कोण टाळणार? असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे या मुळे पालक विध्यार्थी याच्या मनात प्रचंड नाराजी पसरली असून याचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.