09/06/2025

तहसील कार्यालयातून जन्म-मृत्यूचे दाखले देण्यास सुरवात ; नागरिकांमधून समाधान

0
IMG-20240807-WA0011.jpg

करमाळा, दि. ७ (करमाळा-LIVE)-
नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जन्म-मृत्यूची नोंद नसल्यास किंवा चुकीची नोंद लागली असल्यास ति नोंद लावण्यासाठी किंवा दुरूस्ती साठी नागरिकांना न्यायालयातून आदेश आणावा लागत होता नंतर हा अधिकार प्रांत कार्यालयला दिला होता मात्र सामन्यांची होत असलेली ससेहोलपट पाहता तहसीलदार यांना हे आदेश पारित करण्याचे अधिकार शासनाने दिले होते.

तहसिलदार यांना अधिकार प्राप्त झाल्यापासून अनेक नागरिकांनी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केले होते मात्र कुणबी प्रकरणाच्या अतिरिक्त भारामुळे या अर्जाची सर्कल चौकशी जाहिरात प्रसिद्धीकरण रखडले होते. आधार कार्ड अपडेट्स करण्यासाठी जन्म दाखल्याची तर वारस नोंदीसाठी मृत्युच्या दाखल्यासाठी गरज लागत असल्याने नागरींकाची मोठी गैरसोय होत होती.

यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फारुक जमादार, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, युवासेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी वेळोवेळी पाठपुरवा केला होता.

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या मागणीची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ सर्व अर्जांची सर्कल चौकशी करून वृत्तपत्रातून नोटीसा जारी केल्या होत्या यावर हरकतीची तीस दिवसांची मुदत संपल्यानंतर हरकत न आलेल्या नागरींकाच्या जन्म-मृत्युच्या तारखेची नोंद धरून संबधीताना दाखला देण्याचे आदेश पत्र आज प्रातिनिधिक स्वरूपात हिवरे येथील अश्विनी फरतडे व कोळगाव येथील रमेश चेंडगे यांना देऊन आदेश देण्यास सुरवात केली आहे.

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही सुरू केल्याने सामाजिक संघटना व नागरींकाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कुणबी प्रकरणाच्या पडतळाणी मुळे सर्कल, तलाठी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण असल्याने या अर्जांची सर्कल चौकशी रखडली होती मात्र नागरींकाची गैरसोय होत असल्याच्या लक्षात आल्याने युद्धपातळीवर चौकशी करून त्याचे प्रसिद्धीकरण करून आजपासून आदेश देण्यास सुरवात केली आहे.
शिल्पा ठोकडे, तहसिलदार

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page