अन् महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा कार्याचा आलेख वाढत गेला


करमाळा, दि. 6 (नरेंद्रसिंह ठाकूर यांच्या लेखनीतून)-
एकात्म मानववाद या विचारधारेवर चालणारी पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी होय. भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली. आज भाजप चा 43 वा वर्धापन दिन.
पंडित दिनदयाल उपाध्यय, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहमीच पार्टीसाठी प्रेरणास्तोत्र ठरले. भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असा प्रवास करीत असताना पार्टी मधील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी संघर्ष करून आज सत्तेचे शिखर गाठले आहे. महाराष्ट्रातील वाटचाल पाहिल्यास आपल्या विचारधारेचशी प्रामाणिक राहून येणारी प्रत्येक निवडणूक लढवून संघटन मजबूत करून जनाधार वाढविला आणि सत्तेच्या माध्यमातून विकासाची ध्येय धोरणे राबविण्यात यश मिळविले. पक्षाची स्थापना ते सत्तेचा काळ पाहिला तर महाराष्ट्रातील ज्या ज्या अध्यक्षांनी सूत्रे हाती घेतली ,त्यांनी नेहमीच पक्ष संघटना वाढवली, डावी विचारसरणी उजवी विचारसरणी या अनुषंगाने जनता राजकीय पक्षांबाबत तर्क करत असत. भाजप नेहमीच काँग्रेस, समाजवादी विचारांचे जनता दल तसेच कम्युनिस्ट, शेकाप अशा अनेक पक्षांबरोबर संघर्ष अनेक दशके चालूच ठेवला. पक्ष स्थापनेच्या वेळेस महाराष्ट्रातील धुरा 1980 ते 86 पर्यंत उत्तमराव पाटील यांनी सांभाळली होती. त्यानंतर 1986 ते 1991 दरम्यान गोपीनाथराव मुंडे तर ना. स. फरांदे 1991 ते 1994, सूर्यभान वहाडवणे-पाटील 1994 ते 2000, पांडुरंग फुंडकर 2000 ते 2005, नितीन गडकरी 2005 ते 2009, सुधीर मुनगंटीवार 2010 ते 2013, देवेंद्र फडणवीस 2013 ते 2015, रावसाहेब दानवे 2015 ते 2019, चंद्रकांत पाटील 2019 ते 2022, सध्या चंद्रशेखर बावनकुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राची धुरा यशस्वी पणे संभाळत आहेत.
आजच्या स्थितीत केंद्रात तसेच राज्यात सत्तेमध्ये भाजपा काम करत आहे या कालावधी मध्ये प्रशासकीय निर्णय चांगले होत असले तरी कार्यकर्त्यां बाबतीत धोरणात्मक भूमिका बजविल्यास पक्ष संघटना आणखीन मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी संवादाची माध्यमे कमी होती परंतु संवाद होत होता. डिजिटल च्या युगात संवादांची माध्यमे प्रचंड झाली आहेत परंतु संवाद क्षीण होत चालला आहे, यामुळे निश्चितच दरी वाढत आहे. याबाबत पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांचे मत आठवते ते म्हणतात की, ‘जिस दिन बिजेपी अपने कार्यकर्ता ओं का ध्यान उस तरह रखना सीख लेगी, जिस तरह विपक्षी पार्टीयां अपने कार्यकर्ताओ का रखती है’ बिजेपी को अगले सौ सालो तक कोई हिला नही पायेगा बिजेपी के शिर्ष नेता इन बातो पे ध्यान दे.!
भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
संपादन : नरेंद्रसिंह ठाकूर, करमाळा, 9423333975

