सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद ; पुनर्वसित भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार- दिग्विजय बागल

करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)-
केत्तूर- २ येथील सभेस ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देत महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांना विधानसभेच्या निवडणूकीत संपूर्ण सहकार्य करत विजयी करण्याची ग्वाही दिली.
केत्तूर- २ सह पूनर्वसित भागातील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी मी मा.एकनाथजी शिंदे साहेबांचे मार्गदर्शनाखाली महायुतीचे सरकार कटिबध्द आहोत. केत्तूरकरांनी दिलेल्या प्रेमादरामुळे मी भारावून गेलो आहे. या प्रेमाची उतराई होण्याची संधी विधानसभेत जाऊन या भागातील समस्या सोडवून करणार . धनुष्यबाणाला मतदान करून आपणास निवडून देऊन महायुतीच्या विजयाचे शिल्पकार आपण व्हाल असे भावोद्गार उमेदवार दिग्विजय बागल यांनी काढले.
प्रचंड उत्साहाने संपन्न झालेल्या मिरवणूकीत व सभेस शेकडो मतदार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.