सोलापूर जिल्ह्यात हरितक्रांतीचा मुळ पाया स्व.नामदेवराव जगताप यांनी उभारला; आमदार संजयमामा शिंदे


करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
उजनी धरणाच्या उभारणीत माजी आमदार स्व.नामदेवराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदर्शीपणामुळेच आज सोलापूर जिल्ह्यात तब्बल चाळीस साखर कारखाने असून जिल्ह्यात झालेल्या हरितक्रांतीचा मुळ पाया स्व नामदेवराव जगताप यांनी उभारला असून स्व जगताप यांचे शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्य अविस्मरणीय असून संपूर्ण जिल्हा त्यांचा रुणी असल्याचे गौरवोद्गार करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी काढले.
स्व. नामदेवराव जगताप यांच्या 103 व्या जयंती निमित्त बाजार समिती येथे आयोजित समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप होते. या वेळी आमदार शिंदे, माजी आमदार जगताप यांचे हस्ते स्व नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे युवानेते शंभुराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष नारायण जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, रावगावंचे सरपंच दादासाहेब जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य तात्यासाहेब शिंदे, मांगी सोसायटीचे चेअरमन सुजित बागल, शहाजी शिंगटे, प्रभाकर शिंदे, राजेंद्र चिवटे, परेश दोशी, विक्रांत मंडलेचा, मिलिंद दोशी, मनोज पितळे, अमृत परदेशी, नवनाथ सोरटे, झनकसिंग परदेशी, अॕड नवनाथ राखुंडे, जिल्हा बँकेचे वरीष्ठ बँक निरीक्षक अभयसिह आवटे, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांच्यासह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक युसुफ शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय भागडे यांनी केले व आभार गटसचिव बबन मेहेर यांनी मानले.
