दहिगावं उपसा सिंचनाचे आवर्तन गुरूवार पासून सुरू होणार ; माढा-सीना जोडकालव्यातून उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार- आमदार नारायण आबा पाटील

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-
दहिगावं उपसा सिंचनाचे आवर्तन गुरुवार दि. २६ जून पासून सुरु होणार असून भीमा-सीना बोगद्यातून आजपासून पाणी सोडले जाणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील म्हणाले की, आजमितीस उजनी धरणात ७३ टक्के पाणी साठा असून यात दररोज हजारो क्युसेसने वाढ होत आहे.
पूर्व भागातील तसेच सीना-माढा बोगद्याकाठच्या शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आपण उजनी धरण लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांचेशी चर्चा केली व आवर्तन मागणी केली. यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली असून आवर्तन देण्यासाठी नियोजनास तयारी सुरू केली करमाळा तालुक्यातील पुर्व भागात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण मध्यम असल्याने या आव्रतनातून लाभक्षेत्रातील तलाव, बंधारे, नाला बिल्डींग, कोप बंधारे, शेततळी, ओढे आदी पाणी साठ्यात पाणी दिले जावे अशी सुचना आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
तसेच दहिगावं येथील पंप हाऊस एक व कुंभेज येथील पंप हाऊस दोन मधील सर्वच्या सर्ध दहा पंप हे पूर्ण क्षमतेने चालवून किमान १२० क्युसेस विसर्ग प्राप्त केल्यास मोठे तलाव भरण्यासाठी वेळ जाणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही आपण सुचित केले आहे. मागील आवर्तनातील तांत्रीक अडचणी तात्काळ दुर करुन इथून पुढील सर्व आवर्तने ही पुर्ण क्षमतेनेच दिली जावीत अशी सुचना आपण तांत्रीक व इलेक्ट्रिक विभागास दिली आहे. यामुळे या आवर्तनाचा जादा लाभ करमाळा तालुक्यातील वंचित गावांना दिला जाईल.
तसेच वडशिवणे तलावात चारीच्याही अडचणी दुर करण्याचे आदेश आपण दिले आहेत. तरी सीना-माढा बोगदा व दहिगाव उपसा सिंचन या दोन्ही माध्यमांतून करमाळा मतदार संघात लाभक्षेत्रातील गावांना नियोजनबद्ध पध्दतीने पाणी दिले जाईल असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.