केत्तूर : सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी- अॕड बाळासाहेब जरांडे


केत्तूर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे मत माजी उपसरपंच अॕड बाळासाहेब जरांडे यांनी व्यक्त केले आहे.
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करावा. बिनविरोध निवडणूकसाठी माझा पाठिंबा असून केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास शासनस्तरावरील विविध योजनांचा गावास लाभ मिळेल. ज्या लोकांनी निवडणूक बिनविरोध साठी पुढाकार घेतला आहे त्यांनी सर्वांना विचार घेऊन निवडणूक बिनविरोध करणे साठी पुढाकार घ्यावा.वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने केत्तूर गावचा विकास हा केंद्र बिंदू मानून निवडणूक बिनविरोध करावी. मिटींग मध्ये सर्वांना बोलवण्यात यावे मिटींग सार्वजनिक ठिकाणी असावी असे अॕड जरांडे यांनी सांगितले.


- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’ चे कृषी तज्ञ तुषार अहिरे यांनी केले आवाहन
- २३ वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००२ सालच्या बॕच ने केले अनोखे गेट-टू-गेदर
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेऊर रेल्वे येथे वृक्षारोपण
- पोथरे येथील मथुराबाई देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन
- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार दिनेश मडके ‘महाराष्ट्र महागौरव’ पुरस्काराने सन्मानीत