केत्तूर : सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी- अॕड बाळासाहेब जरांडे

केत्तूर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे मत माजी उपसरपंच अॕड बाळासाहेब जरांडे यांनी व्यक्त केले आहे.
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करावा. बिनविरोध निवडणूकसाठी माझा पाठिंबा असून केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास शासनस्तरावरील विविध योजनांचा गावास लाभ मिळेल. ज्या लोकांनी निवडणूक बिनविरोध साठी पुढाकार घेतला आहे त्यांनी सर्वांना विचार घेऊन निवडणूक बिनविरोध करणे साठी पुढाकार घ्यावा.वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने केत्तूर गावचा विकास हा केंद्र बिंदू मानून निवडणूक बिनविरोध करावी. मिटींग मध्ये सर्वांना बोलवण्यात यावे मिटींग सार्वजनिक ठिकाणी असावी असे अॕड जरांडे यांनी सांगितले.


- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर
