केत्तूर : सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी- अॕड बाळासाहेब जरांडे

केत्तूर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे मत माजी उपसरपंच अॕड बाळासाहेब जरांडे यांनी व्यक्त केले आहे.
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करावा. बिनविरोध निवडणूकसाठी माझा पाठिंबा असून केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास शासनस्तरावरील विविध योजनांचा गावास लाभ मिळेल. ज्या लोकांनी निवडणूक बिनविरोध साठी पुढाकार घेतला आहे त्यांनी सर्वांना विचार घेऊन निवडणूक बिनविरोध करणे साठी पुढाकार घ्यावा.वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने केत्तूर गावचा विकास हा केंद्र बिंदू मानून निवडणूक बिनविरोध करावी. मिटींग मध्ये सर्वांना बोलवण्यात यावे मिटींग सार्वजनिक ठिकाणी असावी असे अॕड जरांडे यांनी सांगितले.


- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. बाळकृष्ण लावंड सन्मानित
- वन्यजीवांसाठी ‘जलदूत’ बनले सातव बंधू ; सौरभआणि माऊली यांच्याकडून वनक्षेत्रालगतच्या पाणवठ्यात नियमित पाणीपुरवठा
- जेऊरवाडी येथील योगेश निमगिरे यांचे आकस्मिक निधन ; जेऊर परिसरात शोककळा
