08/06/2025

महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळ्यातून पन्नास हजारांचे मताधिक्य देणार- आमदार संजयमामा शिंदे

0
IMG-20240505-WA0038.jpg

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील प्रलंबित विकासकामे करण्यासाठी राज्यात व केंद्रात एका पक्षाची सत्ता असणे गरजेचे आहे राज्यातील माहिती सरकारने करमाळा तालुक्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित सर्व कामे पूर्ण होणार असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळा तालुक्यातून पन्नास हजाराचे मताधिक्य मिळेल असा विश्वास आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला.

करमाळा तालुक्यातील जवळपास 108 गावाचा गाव भेट दौरा केला. रायगाव येथे झालेल्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुजित बागल, तालुकाध्यक्ष भरत अवताडे, अभिषेक आव्हाड, दादा जाधव, भोजराज सुरवसे, भाजप शाखाप्रमुख भोसे सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय शिंदे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील रस्ते पाणी वीज आणि वीज हे प्रश्न सोडण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

खासदार नाईक-निंबाळकर यांना मत देणे म्हणजे विकासाला मतदान नरेंद्र मोदींना मत देणे अजित दादांना मत देणे व स्वतः मला मत देणे हे समजून प्रत्येकाने कमळाला मतदान करावे.

यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत दिली आहे वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक रुग्णांना एक कोटी तीस लाख रुपयांची मदत झाली आहे. 147 कोटी रुपये दुष्काळ निधी मिळाला आहे गेली पाच वर्षापासून रेशन फुकट आहे शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून दर महिना दरवर्षी 12 हजार रुपये मिळत आहेत. कुकडी दहेगाव ची प्रकल्प मार्गी लागत आहेत यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर जनता खुश असल्यामुळे याचा फायदा खासदार निंबाळकर यांना होणार असल्याचा दावा केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page