07/06/2025

रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल  करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान

0
IMG-20241213-WA0009.jpg

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)-
रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,
या जाचक अटीमुळे शेतकरी विहिरीपासून वंचित राहत आहे सोलापूर जिल्ह्याच्या इतर तालुक्याचे तुलनेत या अटीमुळे तफावत आढळून येत असून माढा तालुक्यात १७००विहिरी मंजूर आहेत त्यापैकी १४०० चे विहिरीचे काम चालू आहे माळशिरस तालुक्यात ११०० मंजूर आहेत ७०० चे काम चालू आहे पंढरपूर तालुक्यात ९०० चे मंजूर आहे.

साडेसहाशे काम चालू आहे बार्शी तालुक्यात पंधराशे विहिरी मंजूर आहेत त्यापैकी ९०० विहिरीचे काम चालू आहे. परंतु करमाळा तालुक्यामध्ये फक्त ९७विहिरी मंजुरी असून प्रत्यक्षात ७२ विहिरी चालू आहेत ही मोठी खेदाची बाब आहे करमाळा तालुक्यात फार मोठ्या संख्येने शेतकरी रोजगार हमी विहिरीचे काम घेण्या करिता उत्सुक आहेत परंतु संबंधित आपल्या कार्यालयाच्या जाचक अटीमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजने पासून वंचित राहत आहे परिणामी शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले योजनेचा शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात फायदा होताना दिसत नाही.

इतर तालुक्याच्या तुलनेत आपल्या तालुक्यात फक्त तीन अंकी संख्येत सुद्धा विहिरीची कामे मंजूर व चालू नाहीत सदर बाबी फार गंभीर असून सदर विषयात लक्ष घालून जाचक अटी शिथिल करून शेतकऱ्यान योजनेचा फायदा होईल अशी भूमिका प्रशासनाने घ्यावी या मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना दिले आहे यावेळी शिष्टमंडळामध्ये भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर संजय अण्णा घोरपडे महादेव सराटे मल्हारी वारगड संतोष कांबळे पांडव खाडे नागनाथ केकान सुहास पवार आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page