07/06/2025

होय, आमचं ठरलयं! जनतेचा खंबीर पाठिंबा नारायण आबांनाच

0
IMG_20220801_131001-2.jpg

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-
शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माढा लोकसभा लढविणार असल्याचे बातम्या काल पासून सोशल मिडीयावर वेगाने फिरत आहेत, भाजप ने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगाल्यावर काल बैठक घेण्यात आली होती, या बैठकीसाठी माजी आमदार नारायण पाटील देखील उपस्थित होते, दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी नारायण पाटील यांचे जेऊर येथे भेट घेटली, त्यानंतर नारायण पाटील हे माढ्यातून लोकसभा लढविणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, तर करमाळा तालुक्यातील पाटील गट आता सरसावला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोडी घडताना येत असून नारायण पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजप चे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या मैदानात उतरणार अशा प्रकारच्या पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या आहेत.

पाटील गटाच्या सोशल मिडीया तालुका प्रमुख संजय फरतडे यांची पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे-

होय,आमचं ठरलय !

माढा लोकसभा मतदार संघात सध्या एकीकडे उमेदवारीवरुन पेच निर्माण झाला असुन दुसरीकडे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी आपली भूमिका बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.यामुळे याचे पडसाद केवळ करमाळा तालूक्यातच नव्हे तर माढा,माळशिरस,सांगोला या सोलापूर जिल्ह्यातील तीनही तालूक्यात उमटले आहेत.
राज्याच्या राजकारणात झालेली गूंतागुत विचारात न घेता सन २०२४ मधील आपले ध्येय निश्चित करताना माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी आता मोठ्या साहेबांचे आपल्याला निमंत्रण असल्याचे सांगून पुढे काय होणार याची जणु झलक दाखवली आहे.
तसं पाहिलं तर माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही आरोप नाही.शिवाय कोणताही निर्णय धाडसाने घेणार आणि दिलेल्या शब्दाला कायम पक्के राहणार ही त्यांची जमेची बाजू होय.सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जर कोणत्याही एका पक्षाची साथ मिळाली असती तरी नारायण (आबा) पाटील हे आज आमदार म्हणुन दिसले असते अशी तळमळ प्रत्येक कार्यकर्त्याने या साडेचार वर्षात बोलून दाखवली. केवळ कार्यकर्ताच नव्हे तर सर्व सामान्य शेतकरीही हिच भावना व्यक्त करत होता.
आबांचा सन २०१९ मधील पराभव जनतेच्या मनावर आघात करुन गेला असल्याने मतदार अगदी चातकासारखी विधानसभा निवडणुकीची वाट पहात आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीचे रणशिंग अगोदर फुंकले गेले आहे.करमाळा विधानसभा मतदार संघातील गटातटांची स्थिती पाहता आता योग्य निर्णय घेण्याची हिच वेळ असल्याने माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचेकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच माढा लोकसभा मतदार संघात माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना उमेदवारी दिली तर काय होईल याची चाचपणी मोठे पक्ष करु लागले आहेत.
यात जो काही निर्णय होईल तो होईल पण माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी आपले टार्गेट निश्चित केले आहे.यामुळे बदल‌ तर होणारच. एरव्ही कोणत्या तरी दोन नेत्यांमध्ये काही तरी पक्के ठरले तर “आमचं ठरलय” अशा आशयाचे बॅनर्स पोस्टर्स सगळीकडे झळकतात.पण इथे तसं नाही.इथे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे आणि करमाळा मतदार संघातील मतदारांचे मात्र पक्के ठरले आहे.होय,आमचे ठरलेय अशी जनताच म्हणु लागली आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी अथवा वारसा नसताना सरपंच पदापासुन ते थेट आमदार पदापर्यंत स्वतः च्या हिमंतीवर पोहचणारे नारायण (आबा) पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. यामुळेच आबासाहेब जो कोणता निर्णय घेतील त्या पाठीमागे भक्कम पणे उभा राहण्याचे काम जनता करतेय.माढा लोकसभा मतदार संघात एकगठ्ठा जनाधार असलेला नेता वेळप्रसंगी कोणाशीही निवडणुकीत लोकशाही मार्गाने दोन‌ हात करु शकतो.जनतेनेच तेवढी ताकद आबासाहेब यांच्या पाठीमागे उभी केली आहे.
सन २०१४ ते २०१९ दरम्यान अहोरात्र जनतेसाठी झटुन एकोणीस वर्षे रखडलेले प्रकल्प नारायण (आबा) पाटील यांनी कार्यान्वित केले.वीस-वीस वर्षे रखडलेली आणि उध्वस्त झालेली करमाळा तालुक्यातील दळणवळण यंत्रणा पक्के रस्ते निर्माण करुण जागेवर आणण्याची किमया या रोडकिंग आमदाराने करुन दाखवली.दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन त्याचे पाणी पुर्व भागात खेळवले पण त्याच बरोबर मसेवाडी आणि इकडे वडशिवणे तलावात उजनीचे पाणी पोहोच करण्याची किमया या जलनायक आमदाराने करुन दाखवली.प्रशासनावर‌ वचक ठेवत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामासाठी हेलपाटे मारण्याची पाळी आपल्या आमदारकीच्या काळात नारायण (आबा) पाटील यांनी येऊ दिली नाही. “आबांना फोन‌ करु का” एवढं एकच वाक्य शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे काम करुन घेण्यास पुरे होते.वीज, आरोग्य,शिक्षण,पुनर्वसन,सिंचन,महसुल,दळणवळण,ग्रामविकास,कृषी असे एकही क्षेत्र उरले‌ नाही, प्रत्येक क्षेत्रात आबासाहेब यांनी भरगोस निधी आणुन‌ खुप कामे केली.यामुळेच मग २८८ आमदारांच्या विकासकामांच्या या स्पर्धेत राज्यात पाचवा क्रमांक मिळवण्याची किमया लाल मातीत राहुन देशभर नाव कमवलेल्या या पैलवान आमदाराने करुन दाखवली.
यामुळेच मग विकास म्हणजे नारायण (आबा) आणि नारायण (आबा) म्हणजे विकास हे समीकरण करमाळा तालुक्यातील गावोगाव आणि वाडीवस्तीवर रुजले.आज परत एकदा हे समीकरण प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी जनता आणि नारायण (आबा) यांच्यात काहीतरी ठरलय…जनताच म्हणतेय होय,आमचं ठरलय ! मग आता आबासाहेब लोकसभेला उभे राहु अथवा विधानसभा निवडणुकीत उभे राहु,जनतेचा खंबीर पाठींबा नारायण (आबा) पाटील यांनाच राहणार आहे.आबासाहेब यांच्या नावापुढे फार काळ माजी आमदार असा उल्लेख राहु नये यासाठी जनता तयार आहे…आता फक्त खासदार नारायण (आबा) पाटील कि आमदार नारायण (आबा) पाटील एवढाच निर्णय होणे आहे..बाकी आमचं ठरलय, होय आमचं ठरलय !

संजय फरतडे, तालुका प्रमुख सोशल मिडीया विभाग पाटील गट

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page