जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने भगवान महावीर जयंती निमित्ताने पालखीचे स्वागत


जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे भगवान महावीर जयंती निमित्त पालखी मिरवणूक प्रारंभी पुष्पहार अर्पण करून पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शीतपेय व पाणी बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आदिनाथ माने म्हणाले की, भगवान महावीर यांच्या अहिंसा आणि अपरीग्रह या दोन महान मानवी मूल्यांवर सकल जैन धर्माचे विचार मानव जातीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. यावेळी उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मिनाक्षी पाटील, सुवर्णा घाडगे, राणी पाटील, प्रियंका खटके तसेच संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, दादासाहेब थोरात निलेश पाटील, अतुल निर्मळ, धन्यकुमार गारुडी, पांडुरंग घाडगे, आदिनाथ माने, बाळासाहेब तोरमल, सोमनाथ जाधव, अजित उपाध्ये आदी उपस्थित होते.




