करमाळा बाजार समितीचे माजी संचालक कैलास पाखरे यांचा बागल गटात प्रवेश ; रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास- चिंतामणी जगताप

करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील सोगाव येथील नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलास पाखरे यांनी मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला गावपातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. युवानेते दिग्विजय बागल सर्व मतभेत विसरुन दुरावलेल्या सर्व सहकार्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत सोबत घेणार असल्याचा निर्धार मेळाव्याप्रसंगी करत आहेत.
यापूर्वी वीट येथील मेळाव्यात पोंधवडी गावचे युवा नेते अमोल गाडे यांनी तर सालसे येथील तानाजी लोकरे यांनी केतूर येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, सतीश नीळ, रेवन्नाथ निकत, गणेश झोळ, बापू चोरमले, संतोष पाटील, बाळासाहेब सरडे, स्वप्निल गोडगे, आशिष गायकवाड, अजित झांजुर्णे, रामभाऊ हाके, साधना खरात, कल्याण सरडे, काशीनाथ काकडे, देवा ढेरे, युवराज रोकडे, गणेश तळेकर, डॉ विजय रोकडे आदी पदाधिकारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील गावपातळीवरील विरोधी गटातले अनेक प्रमुख कार्यकर्ते रश्मी बागल व युवानेते दिग्विजय बागल यांच्या संपर्कात असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गटात प्रवेश करणार आहेत. बागल गटाच्या विचाराला मानणारे परंतु काही कारणाने दुरावलेले असे सर्व हितचिंतक रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रिटेवाडी उपसा सिंचन योजना, एमआयडीसी, मांगी तलाव, केम वडशिवणे उपसासिंचन, सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप होणे, उजनी जलाशयावरील पुल, आरोग्य, रस्ते, वीज अशा विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी करमाळा तालुक्यातील मातब्बर मंडळी प्रवेश करणार आहेत.
तालुक्यातील जनतेचा इतर राजकीय गटांवर विश्वास राहिलेला नाही, बागल गटच तालुक्याचा विकास करू शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागल गटात असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी दिली आहे.