काही समाजकंटकांच्या स्वार्थामुळे पराभूत व्हावं लागलं, परंतु हार न मानता त्याच जोशाने पुन्हा जनतेसाठी मैदानात उतरून जनतेच्या सुख-समाधानात भाग घेतला

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
काही समाजकंटकांच्या स्वार्थामुळे पराभूत व्हावं लागलं, परंतु हार न मानता त्याच जोशाने पुन्हा जनतेसाठी मैदानात उतरून जनतेच्या सुख-समाधानात भाग घेतला, अशा या महान जनतेच्या नेतृत्वाच गुणगान करावे तेवढे कमीच आहे, अशा प्रकाराची पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेली असून आगामी विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायण पाटील यांनी सध्यातरी तालुक्यात आघाडी घेतलेली असून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असून आगामी विधानसभा पुन्हा काबीज करणार असल्याचे मत पाटील गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेली पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे-
करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर नेहुण ठेवणाऱ्या कार्यसम्राट-पाणीदार-रोडकिंग-विकासरत्न-जिल्हाकार्यसम्राट अश्या एक नाही तर अनेक जनतेने बहाल केलेल्या पदव्यांच महान आस जनतेचं लोकनेतृत्व मा.आ.श्री.नारायण(आबा)पाटील*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तसं पाहिलं तर करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग हा आजपर्यंत मागासलेला भाग म्हणून ओळखला जायचा आजपर्यंत किती नेते आले व रस्ता-लाईट-पाणी याच विषयावर लोकांना फसवत गेले व सत्ता भोगत पश्चिम भागाच्या जीवावर राजकारण आमदार व इतर पदावर विराजमान झाले व या जनतेला विसरलेही..
परंतु म्हणतात ना *भगवान के घर देर है लेकीन अंधेर नाही* या म्हणीप्रमाणे एखादाचा २०१४ तो दिवस उजडला व करमाळा तालुक्यातील जनतेने खऱ्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवून जणू काही नवीनच इतिहास रचला इतिहास नव्हे *श्री. नारायण(आबा)पाटील* यांच्या रूपाने शेतकऱ्यांचा व सर्व सामन्य जनतेचा हिराच विधानसभेत पाठवला..
विधानसभा प्रचार निवडणुकीत *श्री.नारायण(आबा)पाटील* यांनी विविध विकास कामांचा लेखाजोखा पश्चिम भागातील जनतेसमोर मांडला की मी ही कामे पूर्ण करणार तेव्हाच २०१९ ला तुमच्या समोर मत मागायला येणार *(आश्वासने देऊन जनतेला मतांची भीक मागणारे व वाऱ्यावर सोडणारे मी आजपर्यंत भरपूर पाहिले)* आम्ही ही कार्यकर्ते तसं पाहिलं तर नवखेच पण मनात कोठेतरी वाटायचं की हीच आश्वासन मागील काळात चांगल्या-चांगल्या राती महारतींनी दिली होती अगदी तालुकाच काय देशपातळीवर राजकारण करणारांनी ही आश्वासने पूर्ण नाहीत केली तर हे *श्री.नारायण(आबा)पाटील* काय करणार प्रश्न निर्माण होण सहाजिकच होत कारण की *दूध पोळल्यावर माणूस ताक ही फुंकून पितोच* ही म्हण आम्ही जुन्या म्हाताऱ्या माणसांकडून ऐकत आलो होतो..तर पारख तर करावीच लागणार होती…
आम्ही पाटलांचा लिहलेला वाचननामा नीट वाचला व एकदा विश्वस ठेवायचा ठरवला जसा मागील नेत्यांवर ठेवला अगदी तसाच..
पश्चिम भागातील वचननाम्यातील जेव्हा ठळक मुध्ये वाचनात आले त्यावेळी विशेष होते ते या भागातील रस्ते आणि याच वचननाम्यात अगदी देश स्वतंत्र झाला त्यापासून कधीही कामे न झालेल्या रस्त्यांची यादी त्या यादीत आजपर्यंत फक्त आश्वासने दिलेले हेच ते रस्ते…
*कोर्टी-टाकळी चौफुला रस्ता-३३ की.मी.*
*गुलमोहरवाडी-पोमलवाडी मार्गे डीकसळ पूल रस्ता-१९की.मी.*
*रामवाडी-जिंती-भगतवाडी-पारेवाडी मार्गे कुंभेज फाटा रस्ता ३५ की.मी.*
*पोमलवाडी-केत्तुर नदीवरील पुल,*
*केत्तुर-२ ते केत्तुर-१ नदीवरील पूल.*
*【विशेष म्हणजे या कामांची दखल देशपातळीवरिल नेत्यांनी घेतली होती आश्वासने पण दिली होती त्यातील ते हेच महत्वाचे दोन्ही पोमलवाडी-केत्तुर नदीवरील पूल】*
पुनवर्सन गावांसाठी विकास निधी अशी कित्तेक कोटींची विकासकाने या वाचननाम्यात वाचायला मिळाली पण विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न मात्र आमच्यापुढे मोठाच… तर मग सांगा कामे पूर्ण होतील आसा विश्वास तरी कसा ठेवायचा आम्हा सारख्या नवख्या कार्यकर्त्यांनी बर विश्वास ठेवावा तर आपण ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्याशी तरी आपली कोठे ओळख परंतु मनात एकच विचार केला *”अभी नही तो कभी नाही “* असच विचार माझ्या सारख्या असंख्य पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी,शेतकरी बंधू भगिनींनी *श्री.नारायण(आबा)पाटील* यांच्यावर विश्वास ठेवत विधानसभा निवडणुकीत थोड्या का होईना मतांनी पाठवलं.
दिवसांमागून दिवस गेले कोठेतरी मनाला वाटायला लागलं *”मागचीच कर्म पुन्हा पुढे आली आणि आणि ताकाचीच कडी आणि ताकाचाच भात”* या म्हणी प्रमाणे आपण निवडून दिलेल्या व्यक्ती विषयी शंका येऊ लागल्या.
परंतु जेव्हा काही वाघान कामाचा धडाका लावला तेव्हा कुठे आपलं लाख-मोलाचं मत वाया नाही गेलं ते सिद्ध झालं वचननाम्यात दिल्याप्रमाणे पहिलंच काम मंजूर केलं ते *गुलमोहरवाडी-पोमलवाडी मार्गे डीकसळ पूल रस्ता. रक्कम १६ कोटी* तो आज वाहतुकीस सज्ज आहे.
जे कधीही कोना नेत्याला जमलं नाही ते आगदी सर्व सामान्य नेतृत्वाने करून दाखवलं.आम्हा कार्यकर्त्यांचा गेलेला विश्वास पुन्हा *श्री.नारायण(आबा)पाटील* यांच्या रूपात पहायला मिळाला व पश्चिम भागातील जनतेने अक्षरशा आबांना आपल्या ह्रदयात स्थान दिल.लगेच दुसरी मंजुरी मिळाली ती *कोर्टी-जिंती मार्गे टाकळी चौफुला रस्त्याची. रक्कम ३३ कोटी.तो ही आज वाहतुकीस पूर्ण पणे सज्ज आहे*
निधींचा नुसता पाऊसच पश्चिम भागात पडू लागला.दिवसेंदिवस लोकांचा विश्वास वाढू लागला आम्ही निवडून दिलेल्या वाघाची तर खरी हवा तेव्हाच झाली जेव्हा चांगल्या-चांगल्या रती-महारतींना मंजूर न करता आलेली कामे *पोमलवाडी-केत्तुर पूल व केत्तुर-२ ते केत्तुर-१ ही पुलांची जवळपास १६ कोटी एक काम वाहतुकीस सज्ज तर दुसरे काम अंतिम टप्प्यात* मंजूर करून पुन्हा एकदा सिद्ध केलं की आम्ही निवडलेल्या माणसाने अगदी आमच्या माताच सोन केलं.पुन्हा लगेच पाठोपाठ *रामवाडी-जिंती-भगतवाडी-पारेवाडी मार्गे कुंभेज फाटा रस्ता रक्कम १३५ कोटी व पुनर्वसन भागाला जवळपास २६ कोटी* अशी कित्तेक न होणारी कामे आदरणीय कार्यसम्राट आमदार *मा.श्री.नारायण(आबा)पाटील* यांनी केली परंतु काहीही म्हणा काही भमट्यांची नजर या जनतेच्या खऱ्या नेतृत्वाला लागलीच आणि दुर्दैवाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आगदी थोडक्यात पराभवाला सामोरे जावे लागले.काही समाजकंटकांच्या स्वार्थामुळे पराभूत व्हावं लागलं परंतु हार न मानता त्याच जोशाने पुन्हा जनतेसाठी मैदानात उतरून जनतेच्या सुख-समाधानात भाग घेतला.
अश्या या महान जनतेच्या नेतृत्वाच गुणगान-गाव तेवढं कमीच आहे.