जेऊरच्या संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

जेऊर, दि. २ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०४ जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मरणोत्तर भारतरत्न देऊन केंद्र सरकारने सन्मानित केलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे मराठी मातीत जन्मलेलं एक अनमोल रत्न म्हणजे अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला.
त्यांनी १३ लोकनाट्य, ३ नाटके, १३ कथासंग्रह, ३५ कादंबऱ्या, १ शाहिरी पुस्तक १५ पोवाडे, १ प्रवास वर्णन, ७ चित्रकथा, यात्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या खूप गाजल्या. जो व्यक्ती अवघे दीड दिवस शाळेत गेला या व्यक्तीची साहित्य संपदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवण्यात आली हा आधुनिक युगातील एक चमत्कार आहे. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला.
यावेळी उपस्थित नितीन खटके निलेश पाटील हेमंत शिंदे अतुल निर्मळ पांडुरंग घाडगे आदिनाथ माने सागर लोंढे पिंटु जाधव ईश्वर लोंढे आदी उपस्थित होते.