06/06/2025

मालवण येथील पुतळा दुर्घटनेची एसआयटी (SIT) चौकशी करा- ठाकरे गटाच्या युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

0
IMG-20240829-WA0050.jpg

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
राजकोट येथील छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेची एसआयटी (SIT) चौकशी करून अधिकारी, ठेकेदार यासह मंत्र्यावर कारवाई करावी अशी मागणी करमाळा तालुका युवासेना प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी राज्यापाल यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

युवासेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजकोट येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही घटना महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्त व समस्त हिंदू बांधवांसाठी काळजात कळ उमटवणारी ठरली. या दुर्देवी घटनेनंतर खरं संपूर्ण सरकार ने राजकोट जावून नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांची व महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्तांची माफी मागायला पाहिजे होती. मात्र संवेदनशील पणा मुर्दाड झालेल्या व सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या या सत्ताधाऱ्यांनी “पुतळा वार्‍याने पडला” ” पुतळा पडला असला तरी ही एक संधी आहे इथे सर्वांत उंच पुतळा बांधू “अशी बालीश वक्तव्य करूण शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

पुतळा दुर्घटनेच्या ठिकणी पाहणी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मंडळी गेली असता आपला जुणा आकस काढण्यासाठी राणे कुटूंबाला पुढे करून आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले व राणे कुटुंबाकडून राजकोट या पवित्र ठिकाणावर हुल्लडबाजी केली गेली.

विरोधी पक्षाच्या आंदोलन मोर्चास प्रत्युत्तर मोर्चे काढण्याची नवी परंपरा भाजपा व मिंधे सरकार करत असून महाराष्ट्रातील राजकीय खिलाडू वृती संपवून “फोडा झोडा राज्य करा” हि ब्रिटिश नितीचा अवलंब करत आहे.

देशभरात नामांकित शिल्पकार असताना केवळ तीन ते चार फुटांच्या मुर्ती बनविण्याचा अनुभव असलेल्या ठाणे येथील युवकांलाच हे टेंडर का देण्यात आले? पुतळा बसवताना या ठिकाणचे भौगोलिक वातावरणाचा व पर्यावरणाचा अभ्यास करुन या वातावरण टिकणारे शिल्प बनवण्याची काळजी का घेतली नाही.? संभाजीराजे भोसले यांनी या पुतळ्यासंदर्भात डिसेंबर २०२३ मध्ये पत्र देऊन पुतळ्याचे शिल्प हे इतर शिल्पा प्रमाणे उत्तम शिल्पकलेच्या नमुन्यात बसत नसून शिल्पाची जडण घडण प्रभावी झाली नसून घाईघाईत शिल्प तयार केल्याचे सांगून नवीन समीती तयार करून नव्याने शिल्प उभारण्याची मागणी केली होती त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले.?

या सर्व घटना संशयास्पद असून या स्मारकाच्या कामत गैरव्यवहार झाला यास बळ देत आहेत तरी या दुर्दैवी घटनेची एसआयटी चौकशी करून संबंधित ठेकेदार प्रशासन व यास काम देण्याची शिफारस करणारे लोकप्रतिनिधींची एसआयटी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

निवेदनाच्या प्रती, राज्याचे राज्यपाल सि पी राधाकृष्णन, युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,
युवसेना सचिव वरूण सरदेसाई, विस्तारक उत्तम आयवळे यांना पाठविण्यात आले आहे.

या निवेदनाची प्रत करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देखील देण्यात आली. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे, युवासेना उप जिल्हाप्रमुख मयुर यादव, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, शहरप्रमुख समीर हालवाई, युवासेना समन्वयक कुमार माने, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, पै आदित्य जाधव, विभाग प्रमुख बालाजी वाडेकर, सोमनाथ पोळ, शाखा प्रमुख ओकांर कोठारे, सचिव तुषार सावंत शिवसेना शाखा प्रमूख शिवाजीराव लोंढे , भाऊ मस्तुद, महिला शहरप्रमुख आशा मोरे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page