करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा हप्ता त्वरीत द्यावा ; येणाऱ्या गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल जाहीर करावी- दादासाहेब येडे

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याने ऊस बिलाचे हप्त्यापोटी दोनशे रुपये प्रामाने शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते तथा धनगर संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब येडे यांनी केली.
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साखर दोनशे रुपयांनी महाग असून उसाच्या दरामध्ये तफावत आहे. सणासुदीचे होऊन गेला तरी कारखानदार उसाच्या बिलाविषयी बोलत नाहीत. गौराई गणपतीचं पुढे असल्याने शेतकऱ्यांना या सणासाठी दोन टप्प्यांमध्ये दिवाळीपर्यंत चारशे रुपये प्रमाणे बिल मिळावेत अशी मागणी शेतकरी वर्गामध्ये होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होत असून शेतकऱ्यांना लवकर बिलाची रक्कम देण्यात यावी अन्यथा ऊस उत्पादकांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा येडे यांनी दिला आहे.
सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाचे प्रत देण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या ऊस गळीत हंगामातील पहील उचल जाहीर करण्यात यावी.
जिल्हातील पहीली उचल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या गळीत हंगामातील पहीली उचल तिन हजार पाचशे रुपये रुपये जाहीर केली.या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांनीही आप आपल्या उचली जाहीर कराव्यात असे आवाहन श्री येडे यांनी केले आहे.
ऊस बिल नसल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे त्यामुळे बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत.