06/06/2025

मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा ; संभाजी ब्रिगेडची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

0
IMG-20240924-WA0027.jpg

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा तसेच करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात व इतर भागात वादळी वाऱ्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेश देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आज २४ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळा दौऱ्यावर असताना त्यांना भेटून संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, गेल्या आठ दिवसांपासून जरांगे-पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. तरी आपल्या स्तरावरील सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. त्यांच्या जीवाला काही झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे करमाळा तालुकाध्यक्ष सुहास पोळ, अतुल निर्मळ, रामहरी मोरे, विकास गुंड,भाऊसाहेब साबळे, सचिन पोळ, अमोल पोळ, अर्जुन नाईकनवरे, नानासाहेब कळसाईत, हेमंत शिंदे, पिंटू जाधव, पांडुरंग घाडगे, वैभव मोहिते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page