३६ गावांना शंभर कोटींचा विकास झाल्याचा दावा पोकळ ; प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
आमदार संजयमामा शिंदे हे वीट येथील सभेत खोटे बोलले, ३६ गावांना शंभर कोटी रुपये विकास निधी झाल्याचा दावा पोकळ असल्याचा हल्लाबोल प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
वीट येथे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांची प्रचारसभा झाली. तेथील आमदार शिंदे यांच्या भाषणाची तळेकर यांनी चिरफाड केली. यावर सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, करमाळा मतदार संघास जोडलेल्या कुर्डूवाडी शहरात आमदार शिदें यांनी ३६० कोटी रुपयांची विकास कामे केली ही गोष्ट खोटी आहे. गेल्या वर्षभरात कुर्डूवाडी येथील नागरिकांनी वीज, पिण्याचे पाणी व रस्ते, गटारी या मूलभूत सुविधासाठी आंदोलने केली. जी काही कामे झाली ती नगरपरिषदेच्या माध्यमातून झाली यात आमदारांचा काही रोल नाही.
तर करमाळा मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावात १०० कोटी रुपयांची विकास कामे केली असे आ शिंदे ज्यावेळी सांगतात तेंव्हा या भागातील नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकाला जाताना बघायला मिळते. या छत्तीस गावांत खराब रस्ते, आरोग्य सुविधाची कमतरता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, शेती साठी पाणी देताना केलेले राजकारण, विजेचे कायमस्वरूपी संकट, शिक्षणाची गैरसोय, वाढती वेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा एकांगीपणा, दहशत, अडवणूक, घराणेशाही यामुळे या छत्तीस गावातील मतदार त्रस्त असून आता आमदार शिंदे यांना पराभूत करून राजकारणातून कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा निर्धार करून आहेत.
सत्ता परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना पुन्हा आमदार करण्यासाठी मतदारांनी निवडणूक हाती घेतली आहे. यामुळे या भागा बद्दल करमाळा तालुक्यातील एक विकासाचे चुकीचे चित्र दाखवत आहेत. तर याच भाषणातून त्यांनी नियोजित नियोजित रितेवाडी उपसा सिंचन योजने बाबत आपण किती काम करत आहोत हे सांगितले.
वास्तविक आमदार म्हणून संजयमामा शिंदे यांनी या योजनेसाठी सकारात्मक प्रयत्न केले नाहीतच उलट या योजनेचे नाव, ठिकाण व आराखडा बदलून एक कधीच अस्तित्वात न येणारी एक योजनाकागदावर मांडून आहे ती योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. तर उजनी जानेवारी महिन्यातच मायनस होण्यात आमदार शिंदे यांचे फार मोठे योगदान आहे. या आमदारांना उजनीत केवळ बोटिंग पुरतेच पाणी उरले तर बस असे वाटते. शेतकऱ्यांचा व धरणग्रस्ताचा विचार यांनी कधीच केला नाही. करमाळा शहरातील विकासा बद्दल आ शिंदे यांना बोलण्याचा अधिकार नाही. आमदार शिंदे यांना सोडताना माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे. तीर्थक्षेत्र विकासा बाबत शिंदे यांनी खोटे वक्तव्य करून देवालाही फसवण्याचा प्रयत्न केला आहे.
दहिगावं उपसा सिंचन योजने बाबत आपण ही योजना चालू ठेवली व आवर्तने दिली हे सांगत आमदार शिंदे यांनी स्वतः आयत्या पिठावर रेघोट्या मारतोय याची कबुली दिली आहे. यामुळे वीट येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या भाषणातील एकही मुद्दा विश्वास ठेवण्यासारखा नाही. संजयमामा शिंदे यांचा पराभव अटळ आहे व यामुळे त्यांची मानसिकता ढासळली आहे व भाषणातून हे दिसून येत असल्याचे सुनील तळेकर यांनी सांगितले.