जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’ चे कृषी तज्ञ तुषार अहिरे यांनी केले आवाहन

कंदर, दि. ६ (संदीप कांबळे)-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २०२५ वर्षाचे थीम प्लास्टिक निर्मूलन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे वृक्षारोपण हे करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी कंदर गावचे सरपंच मौला गुलमोहम्मद मुलाणी यांनी कंदर गावातील लोकांना “दोन झाडे लावल्यास घरपट्टी माफ व वर्षभर पीठ मोफत दळून देण्याचे” आवाहन आजच्या दिवशी केले आहे. श्री मौला मुलाणी सरपंच व उपसरपंच उदयसिंह शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदर येथे आंब्याचे वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विकसित कृषी संकल्प अभियान यात्रे संदर्भात विविध विषयांवर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.तानाजी वळकुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विषय विशेषज्ञ डॉ.स्वाती कदम यांनी ऊस पिक लागवड व पाचट व्यवस्थापन, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर येथील शास्त्रज्ञ सौ पिंकी रायगड यांनी डाळिंब व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विशाल वैरागर यांनी कार्यक्रमाचे रूपरेषा शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे ग्रामपंचायत सदस्य आरकिले माजी सदस्य दिलदार मुलाणी, राजाभाऊ महाडिक, सहाय्यक कृषी अधिकारी, श्री. अजयकुमार बागल, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा), काशीनाथ राऊत, मंडळ कृषी अधिकारी केम, राजेंद्र खाडे, उपकृषी अधिकारी केम तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी व कंदर येथील शेतकरी उपस्थित होते.