08/06/2025

इतना सन्नाटा क्यों है भाई! करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरणही गारठले- ना आरोप-प्रत्यारोप, ना श्रेयवाद; एका नेत्याचे काम उरले फक्त लग्नातील सत्कर आणि गाठीभेटी

0
IMG-20230121-WA0014.jpg
हॉटेल शिवम प्राईड, शेलगावं

करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-
‘इतना सन्नाटा क्यों है भाई! अशी म्हणायची वेळ झालेली असून वातावरण कुठलेही असो नेहमी राजकीय वातावरण तापत असलेल्या करमाळा तालुक्यातील राजकारण सध्या गारठले असून करमाळा तालुक्यातील जनता थंडी मुळे तसेच वातावरण थंड मुळे हैराण झाली आहे. तालुक्यातील एकही नेता सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप तसेच विकासकामांचे श्रेय घेताना दिसून येत नाही तर तालुक्यातील एका नेत्याचे काम फक्त लग्नातील सत्कर घ्यायचे आणि गाठीभेटी घ्यायचे उरलेले आहे असे चित्र पहायाला मिळत आहे.

करमाळा तालुका म्हटलं की, राजकीय चर्चा, कुरघोडी आल्याच, सतत काहीतरी राजकीय घडामोडी सुरू असतात, जनतेच्या प्रश्नांपेक्षा आरोप-प्रत्यारोप तसेच तालुक्यात आलेल्या-झालेल्या-होणाऱ्या विकासकामांमध्ये श्रेय घेण्यासाठी रस्सीखेच सुरू असते.

करमाळा तालुक्यातील राजकारण नेहमीच गटातटातून राहिलेले आहे, एखाद्या राजकीय पक्षापेक्षा गटाचेच राजकारण जास्त आहे. एकेकाळी बागल-पाटील-जगताप या भोवती तालुक्यातील राजकारण असायचे परंतु 2014 विधानसभेला निसटत्या पराभवानंतर शिंदे गटाने तालुक्यात जम बसविला, आणि 2019 विधानसभेला माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा पराभव करून आमदार संजयमामा शिंदे आमदार झाले, आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांमध्ये शिंदे गट गावोगावी पोहचला आहे.

2019 विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविली होती, त्यांचा झालेला निसटता पराभव उल्लेखनीय होता, अपक्ष असूनही दोन नंबरची मते त्यांना मिळाली होती, शिवसेनेची उमेदवारी असती तर तालुक्यातील चित्र वेगळे पहायाला मिळाले असते, आमदारकी गेली तरीही नारायण आबा पाटील यांनी स्वगृही परतून शिवसेनेच्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवले आहे. तर जुलै मध्ये झालेल्या शिवसेनेतील बंडात श्री पाटील हे शिंदे गटात सामिल झालेले आहे.

दुसरीकडे माजी आमदार जयवंतराव जगताप हे सध्या आमदार संजयमामा शिंदे यांच्या बरोबर आहे, 2019 ला आमदार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता, सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप हे किंगमेकर च्या भुमिकेत असल्याचे पहायाला मिळत आहे.

2014 विधानसभेला बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचा 257 मतांनी पराभव झाला, ऐन 2019 विधानसभेला राष्ट्रवादी सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला परंतु तालुक्यातील जनतेने त्यांना सपशेल नाकारले, 2019 ला पराभव जिव्हारी लागण्यासारखा होता, तालुक्यात एकेकाळी सर्वात मोठा गट असणाऱ्या बागल गटाच्या रश्मी बागल यांना तीन नंबरची मते मिळाली.

विधानसभा झाल्यापासून गेल्या तीन वर्षात आरोप-प्रत्यारोप, श्रेयवाद पहायाला मिळत आहे, परंतु सध्या वातावरण थंड असताना तालुक्यातील राजकीय वातावरण ही थंडच असल्यामुळे तालुक्यातील जनतेची करमणूक थांबलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page