08/06/2025

आपल्या सर्वांच्या आपुलकीचा आणि नेहमीचा विषय : जेऊर-टेंभूर्णी रस्ता पुन्हा बनला जीवघेणा

0
IMG-20231112-WA0035.jpg

करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.!

दिवाळी निमित्ताने तालुक्यातील जनतेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी सर्वांच्या आपुलकीचा आणि नेहमीचा विषय म्हणजेच जेऊर-टेंभूर्णी रस्ता पुन्हा एकदा जीवघेणा बनलेला आहे. करमाळा तालुक्यातील टेंभूर्णी-जेऊर ह्या महत्त्वाच्या रस्त्यासाठी कुणीही पुढाकार घेताना आणि प्रश्न मार्गी लावताना दिसून येत नसल्याची भावना सर्वसामान्य नागरीकांमधून व्यक्त होत असून किमान खड्डे तरी बुजवा आणि तातपुरती डागडूजी तरी करा अशी मागणी होत असून प्रवाशांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अहमदनगर-टेंभूर्णी मार्गावरील जेऊर ते टेंभूर्णी ह्या 30 किमी अंतरावर स्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हा रस्ता जीवघेणा झालेला आहे राष्ट्रीय महामार्ग असूनही ह्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम 2012 पासून बंद आहे. तालुक्यातील जनता आता याबाबत हैराण झालेली आहे.

वाहनांचे खूप नुकसान होत असून वाहन चालकांना कसरतीने गाड्या चालवाव्या लागत असून प्रशासनाचे तर पूर्णपणे याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

टेंभूर्णी ते जेऊर रस्ता

टेंभूर्णी-जेऊर ह्या रस्त्याचे सहा महिन्यांपूर्वीच डागडूजी करण्यात आली होती परंतु पावसामुळे गेल्या चार महिन्यांपासून रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडलेले आहेत, फुटजवळगाव, कंदर, कविटगावं, एम.बी नुस्ते हायस्कूल, पांगरे, आदिनाथ कारखाना, शेलगावं, जेऊर उड्डाण पूल आदी परिसरात ह्या रस्त्यांवर मोठमोठे खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झालेले आहेत. रस्त्याच्या बाजूच्या साईडपट्ट्या उखडल्या आहेत. सध्या जेऊरहून टेंभूर्णीला 30 किमी येण्यासाठी खड्ड्यांमुळे एक तास लागत आहे. त्यात कसरतीने व जीव धोक्यात घालून वाहन चालवावी लागत आहे.

किमान प्रशासनाने तरी दखल घेऊन लवकरात लवकर खड्डे बुजवून तसेच तातपुरती डागडूजी करावी मागणी होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page