सभापती शिवाजीराव बंडगर यांनी करमाळा तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचा भ्रमाचा भोपळा फोडला अन् करमाळा बाजार समितीवर बागल गटाची सत्ता आली



करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-
करमाळा बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेली असून मागील पंचवार्षिक चा मागोवा घेतला तर 9 सप्टेंबर 2018 रोजी मतदान होऊन 11 सप्टेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. 3 ऑक्टोबर 2018 रोजी सभापती निवडी दिवशी करमाळा तालुक्याच्या राजकारणात इतिहास घडला अन् माजी आमदार जयवंतराव जगताप यांची 29 वर्षाची सत्ता संपुष्टात आली.
बाजार समितीच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत जगताप कुटुंबा व्यतिरिक्त स्व.पंजाब वस्ताद, स्व.पन्नाकाका लुनावत, स्व. रमणभाई दोशी आणि आता प्रा. शिवाजी बंडगर सर यांनी सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच उपसभापती पदावरती माजी आमदार श्री नारायण आबा पाटील यांनी ही काही काळ काम पाहीले, तर मागील पंचवार्षिक मध्ये उपसभापती पदा वरती हिसरे गणातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले बागल गटाचे खंदे समर्थक चिंतामणी दादा जगताप यांनी हे काम पाहिले. 2018 मध्ये करमाळा बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 8 जागा पाटील-जगताप गटास मिळाल्या होत्या तर बागल गटाला 8 जागा मिळाल्या होत्या आणि शिंदे गटास मात्र दोनच जागा मिळाल्या होत्या. करमाळा बाजार समितीवरती बागल गटाची सत्ता येणार का पाटील-जगताप युतीची सत्ता येणार याची उत्सुक्ता सबंध सोलापूर जिल्ह्यास होती “पुण्यातील चांदणी चौकातील पुल जसा गांधी जयंतीच्या मध्या रात्री प्रशासनाने उधवस्त केला तसेच 2 ऑक्टोबर 2018 च्या गांधी जयंती च्या मध्य रात्रीस प्रा. शिवाजी बंडगर यांनी करमाळा तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचा भ्रमाचा भोपळा फोडला “आणि 3 ऑक्टोबर 2018 रोजी ते आज तागायत म्हणजे पूर्ण पाच वर्षे प्रा.बंडगर व बागल गटाचे चिंतामणी दादा जगताप हे सभापती, उपसभापती राहिले.
दरम्यान यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे दिग्विजय बागल, उपसभापती चिंतामणी जगताप, माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील, सभापती प्रा. शिवाजी बंडगर, शिंदे गटाचे सुजित बागल, चंद्रकांत सरडे, मोहिते पाटील समर्थक डॉ. अमोल घाडगे, भाजपचे दीपक चव्हाण, अमरजित साळुंखे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, शंभूराजे जगताप, रामदास गुंडगिरे, सागर दोंड, जनार्दन नलावडे, विजयसिंह नवले, कल्याण सरडे, अशोक हनपुडे, आनंदकुमार ढेरे, काशिनाथ काकडे, नवनाथ दुरंदे, दादासाहेब जाधव, देवानंद बागल, राहुल गोडगे, वैभव पाटील, रामेश्वर तळेकर, किरण पाटील, संतोष शेळके, दत्ताञय गव्हाणे, रंगनाथ शिंदे, सुनिल सावंत, धनंजय डोंगरे, दत्तात्रय बदे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे, महेशराजे भोसले पाटील, अशोक शेळके, ज्योतीराम नरुटे, दिगंबर नाझरकर, कुलदीप पाटील, राहुल जगताप, विशाल केवारे, किरण कवडे, दादासाहेब सरडे, तात्यासाहेब जाधव, नवनाथ दुरंदे, शरद देवकर, बापूराव लोखंडे, पृथ्वीराज राजेभोसले, युवराज मेरगळ, देविदास बरडे, रविंद्र गोडगे, छगन शिंदे, अतुल राऊत, करू गव्हाणे, विलास कोकणे व सुहास घोलप आदींनी अर्ज दाखल केलेले आहेत.
करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आतापर्यंत 161 अर्ज दाखल झालेले आहेत, तर 161 पैकी 6 जणांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. मावळते उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह सहा अर्ज नामंजूर झालेले आहेत. तर 154 अर्ज मंजूर झाले असून सोमवारी 26 सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार हे समजेल सध्यातरी पाटील-बागल गट युती तर जगताप-शिंदे गट युती होऊन दुरंगी लढत होईल अशी चर्चा सुरू आहे.


