08/06/2025

केत्तूर : सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी- अॕड बाळासाहेब जरांडे

0
IMG_20231013_103247.jpg

केत्तूर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे मत माजी उपसरपंच अॕड बाळासाहेब जरांडे यांनी व्यक्त केले आहे.

केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करावा. बिनविरोध निवडणूकसाठी माझा पाठिंबा असून केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास शासनस्तरावरील विविध योजनांचा गावास लाभ मिळेल. ज्या लोकांनी निवडणूक बिनविरोध साठी पुढाकार घेतला आहे त्यांनी सर्वांना विचार घेऊन निवडणूक बिनविरोध करणे साठी पुढाकार घ्यावा.वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीने केत्तूर गावचा विकास हा केंद्र बिंदू मानून निवडणूक बिनविरोध करावी. मिटींग मध्ये सर्वांना बोलवण्यात यावे मिटींग सार्वजनिक ठिकाणी असावी असे अॕड जरांडे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page