पंचवीस वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००१ सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर

जेऊर, दि. २० (गौरव मोरे)-
जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये काल १९ जानेवारीला पंचवीस वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या.
नोकरी व्यवसाय निमित्त विविध ठिकाणी असणाऱ्या भारत हायस्कूल जेऊर येथे २०००-२००१ साली दहावी मध्ये असणाऱ्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेण्याचे ठरवले या बॅचमधील बरेचसे विविध ठिकाणी नोकरी, व्यावसायिक, अधिकारी तर कुणी वेगवेगळ्या खात्यामध्ये कर्मचारी तर काही जणांनी शेती सांभाळून आपल्या कुटुंबाची प्रगती करत आहे.
जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००१ साल च्या बॕचने व्हट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्रितपणे येऊन सर्वांनी एकमेकांनाशी संपर्क केला आणि सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना मांडली सर्वांनाच ती आवडली तात्काळ सर्वांनी होकार दिला दिवस ठरला वेळ ठरली. ती म्हणजे १९ जानेवारी २०२५ ची.
यावेळी वर्ग मित्र-मैत्रिणी एकत्र आले. शालेय जीवनात असताना घडलेल्या वेगवेगळ्या घटनांची आठवण निघाली. सुख, दुःख, भावनिक, काॕमेडी अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या, त्याच बरोबर वर्षातून किमान दोन वेळा भेटण्याचे ही यावेळी ठरविण्यात आले.
पंचवीस वर्षानंतर आला आठवणींना उजाळा.
पंचवीस वर्षानंतर प्रथमच सर्व विद्यार्थ्यांनी नियोजन करून आपापल्या व्यापातून सवड काढून साजरा केला मित्र स्नेह मेळावा. प्रथम स्व मु ना कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा संदीप इवरे यांनी केले. इंदोर मध्य प्रदेश, पुणे, मुंबई, सोलापूर, पंढरपूर तसेच इतर अनेक ठिकाणहून आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत ही व्यक्त केली. पंचवीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला प्रत्येकाने शाळेविषयी आपलेपणा व कृतज्ञता व्यक्त केली. आभार वैभव पाथ्रुडकर यांनी मांडले. यावेळी विशेष अशा स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद संचेती, अजिनाथ माने, सचिन हजारे व पिनू दोशी व इतर अनेक माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर






