06/06/2025

तीन हजार कोटींच्या कागदावरच्या विकासाला जनतेने सहा महिन्यात दुसऱ्यांदा नाकारले ; आदिनाथला मिळणार नवी ‘संजीवनी’- ‘आदिनाथ’ चा डाव आबा पाटलांनी जिंकला

0
IMG-20250415-WA0018.jpg

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
बहुचर्चीत असलेल्या आदिनाथ कारखान्यावर आमदार नारायण पाटलांनी बाजी मारली असून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॕनलचा सर्वच्या सर्व जागांवर पराभव झालेला आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दुरंगी लढतील पाटलांनी बाजी मारली आहे तर अगोदर विधानसभा नंतर आदिनाथच्या निवडणुकीत तीन हजार कोटींच्या कागदावरच्या विकासाला पुन्हा एकदा नाकारले आहे. त्यामुळे शिंदे गट तालुक्यात बॕकफुटवर गेलेला असून गटाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांना आत्मचिंतण करावे लागणार आहे.

दरम्यान विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण पाटील यांनी ९६०९१ मते घेत संजयमामा शिंदे यांचा १६०१९ मतांनी पराभव केला होता. संजयमामा शिंदे यांना ८०००६ एवढी मते तर शिंदे गटाकडून लढत असलेले दिग्विजय बागल यांचा पराभव झालेला आहे. बागल यांना ४०५४१ एवढी मते मिळाली होती.

आमदार नारायण पाटील यांच्यावर विश्वास, मोहिते-पाटील आणि जगताप गट पाठिंबा
आमदार झाल्यापासून आबा पाटील यांच्यावर जनतेचा विश्वास वाढत गेला. गेल्या काही वर्षांत चांगला जनसंपर्क, मोहिते-पाटील यांचा पाटलांना पुन्हा एकदा सपोर्ट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिलेला पाठिंबा यामुळे माजी आमदार पाटील यांचा विधानसभा बरोबर आदिनाथचा मार्ग यावेळी सुसाट पहायला मिळला.

३ हजार कोटींचा कागदावरचा विकास आणि पराभव-

विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्यासाठी सभा घेतली त्या सभेत ३ हजार कोटींची विकास कामे झाल्याचे अजितदादा बोलले होते, विरोधकांनी याचा पुरेपूर समाचार घेऊन जनतेसमोर खरे काय आहे याची गणिते मांडली, कागदावरच्या विकासाला जनतेने विधानसभा बरोबर आदिनाथ मध्येही सपशेल नाकारले असून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॕनलचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आत्मचिंतण करण्याची वेळ शिंदे गटावर आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page