लोकमंगल समूहाचा स्तुत्य उपक्रम ; वांगी-३ येथे ‘समृद्ध गाव’ अभियानाचा शुभारंम



जेऊर, दि. २२ (संचार वृत्त सेवा)-
लोकमंगल समूहाला एक किनारा आहे की, ज्या किनार्याला समाजकारण, अर्थकारण सारख्या बाजू आहेत. त्यामुळेच लोकमंगल समूहाला आज देशात मानाचं स्थान आहे. सांस्कृतिक, आध्यात्मिक, औद्योगिक क्षेत्रात विकासाची आणि उन्नतीची दिशा देण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं लोकमंगल समूहाच्या वतीने ‘लोकमंगल समृद्ध गाव’ अभियानाचे आयोजन करमाळा तालुक्यातील वांगी- ३ येथे आयोजन करण्यात आले.
मंगळवारी २१ फेब्रुवारीला रोजी वांगी-३ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकमंगल समूह संचलित लोकमंगल समृद्ध गाव अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी या अभियानाचा प्रारंभ म्हणून गावातील धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते तसेच संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब तोरमल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमापूजनाने आली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना या अभियानासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच गावातील विद्यार्थी चैतन्य मोरे याने एक ते दहा वयोगटामध्ये गोळा फेक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा सल्लागार मयूर रोकडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ शाखेचे खातेदार व कर्मचारी उपस्थित होते.


