करमाळा तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- युवासेनेची मागणी


करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)-
सोमवारी १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसाने केळी, आंबा, पेरू या फळबागासह, गुरांचे गोठे, छप्पर, रहात्या घराचे पत्र्याचे शेड आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवासेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी केली आहे.
निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की, दुष्काळी परस्थितीत टँकर ने पाणी आणून, बोअरवेल घेऊन शेतकऱ्यांनी फळबागा जगवल्या होत्या मात्र वादळी वार्याने शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले . दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे या अवकाळी मुळे वादळ वार्याने पुन्हा कंबरडे मोडले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देवून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करावे. तीन ते चार एकर मधील केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला असून महसूल व कृषी विभागाकडून याची तात्काळ दखल घेतली जावी.असे निवेदन नमूद केले आहे.
या निवेदनावर युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर, जिल्हा सचिव आदेश बागल, शहरप्रमुख समीर हलवाई, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, तालुका समन्वयक कुमार माने उपतालुकाप्रमुख माऊली फरतडे, रामेश्वर पांढरमिसे, पांडुरंग ढाणे, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, विभाग प्रमुख सोमनाथ पोळ, गटप्रमुख मयुर तावरे, शाखा प्रमुख ओकांर कोठारे आदींच्या सह्या आहेत.
महावितरण कडुन युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी.
काल झालेल्या वादळी वार्याने अनेक ठिकाणी विद्युत पोलच्या लाईन, रोहित्र पडलेले आहेत त्यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला आहे. दुष्काळी परस्थीतीमुळे विहरींच्या पाण्याची पातळी घटलेली आहे. बोअरवेल शिवाय पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने जनावरांसह नागरींकाच्या पाण्याची गैरसोय होत असल्याने महावितरणने अतिरिक्त कर्मचारी बोलवून युद्धपातळीवर दुरुस्ती करावी अशी देखील मागणी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केली आहे.




