06/06/2025

नारायण आबा पाटील यांना करमाळा तालुक्यासह माढा तालुक्यातील ३६ गावातही वाढता पाठिंबा- लक्ष्मीकांत पाटील

0
IMG-20241111-WA0025.jpg

केत्तूर, दि. ११ (करमाळा-LIVE)-
२४४-करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील ११८ गावांसह माढा तालुक्यातील ३६ गावात पाटील यांच्या दौऱ्यात मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.

गावो-गावो लोक हार नारळ फेटा सह पाटील यांचा सत्कार करून गावातील समस्या मांडत आहेत. तर गेल्या पाच वर्षांत मावळत्या आमदारांनी काहीच प्रश्न सोडवले नसल्याचे मतदार बैठकीत व सभेत सांगत आहेत.गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक रस्ते झाले नसुन उलटं रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

नविन रस्त्यांच्या कामांना मंजुरी आली नसुन मतदारसंघात एक ही नवीन रस्ता दाखवण्या सारखा झाला नसल्याचे जनतेत चर्चा सुरू आहे.
तर उजनी धरणा लगतच्या परिसरात शेती पंपाच्या विज बिल भरण्यासाठी शेतकरी यांना भाग पाडल्याने आणि धरणाचे पाणी मायनस सत्तर टक्के खाली गेल्याने विद्यमान आमदारच्या कामबाबत उजनी धरणा लगतच्या मतदारांत असंतोष निर्माण झाला आहे.वाडी वस्ती वर जाणारे रस्ते जैसे थे च आहेत.तर धरण ग्रस्तांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा ही उपलब्ध झाल्या नाहीत.

करमाळा येथील शासकीय कार्यालये (तहसील कार्यालय, पोलिस ठाणे,भुमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय) हलवुन करमाळा शहरा बाहेर आपल्या मित्राच्या जागे शेजारी हलविण्याचा घाट आमदारांनी घातला आहे.

उजनी जलाशयावर पुल बांधतो म्हणून पश्चिम भागातील जनतेला झुलवत ठेवले.परंतु पाच वर्षांत कोणतेही प्रयत्न आमदार कडून झाले नाहीत.कुगाव-शिरसोडी पुलासाठी प्रयत्न न करता फुकटचे श्रेय आमदार घेताना दिसत आहेत.

पाच वर्षे करमाळा एम आय डी सी मधील उद्योग धंद्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नसून एम आय डी सी ला लागणारे पाण्याची समस्या ही हे लोकप्रतिनिधी सोडवु शकले नाहीत.
केम व परिसरातील कुंकू निर्माण करण्याच्या उद्योगाला चालना मिळण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नसुन केम परिसरात जनतेत ही विद्यमान आमदार बाबत असंतोष असुन या निवडणुकीत नारायण पाटील हे निवडून येतील अशी चर्चा या भागात आहे.

श्री पाटील यांनी आमदार असताना दहीगाव उपसा सिंचन योजना चालू केली असून तालुक्यातील पुर्व भागातील तिस गावांना या योजनेचा फायदा झाला असून या परिसरातील जनतेचे जीवनमान उंचावले आहे.
रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करण्यासाठी नारायण पाटील यांनी शासनदरबारी प्रयत्न करून या योजनेच्या सर्वेक्षण साठी निधी उपलब्ध झाला आहे. परंतु विद्यमान आमदार या योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.रिटेवाडी उपसा सिंचन योजने मुळे तालुक्यातील उत्तर-पुर्व‌ भागातील पत्तिस चे चाळीस गावे ओलीता खाली येणार आहेत.

उजनी धरणात गेल्या पाच वर्षांपासून बुडीत बंधारे बांधतो निधी उपलब्ध करतो असे आश्वासन देण्यात आली.परंतु शेवटी शासन आदेशाचे कारण सांगून बुडीत बंधारे च्या कामांना वाटण्या अक्षता लावण्याचे काम करण्यात आले.

आपले खाजगी साखर कारखाने चालवण्यासाठी तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने कसे बंद पडतील या साठी आमदारांनी प्रयत्न केले.

आपल्या खाजगी साखर कारखाना चालविण्यासाठी शेतकऱ्यांच्या आणि वाहन मालकांच्या नावावर शेत जमीन वर वाहनांवर मोठ्या प्रमाणात खाजगी बँकांचे कर्ज घेतली.
शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटीस आल्यानंतर कर्ज प्रकरणे सेटलमेंट करुन मिटवण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि वाहन मालकांचे सिबिल खराब झाले.

पर्यायने त्या शेतकऱ्यांना कोणत्याही बँकांनी कर्ज दिले नाहीत. मतदारसंघात अनेक गावांत आमदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कर्जांच्या बँकाच्या नोटीसांची होळी करण्यात आली.

गेल्या दहा वर्षा बेंद ओढ्याला पाणी आणतो म्हणणारे अद्याप पर्यंत पाणी आणू शकले नाहीत.छत्तिस गावातील रस्ते पुर्ण पणे उदवस्त झाले असून खड्डात रस्ते का रस्ता वर खड्डे असा प्रश्न तेथील जनतेस पडला आहे.या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले आहे.म्हैसगाव येथील
आपला खाजगी साखर कारखाना विकुन आमदार महोदयांनी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे.

त्यांचे शेअर्स ऊस उत्पादक शेतकरी माघारी माघत आहेत.परंतु त्यांना ते मिळत नाहीत. असे असताना विधानसभा मतदारसंघातील ऊस गाळप करण्याची हमी आमदार रोहीत पवार हे बारामती अँग्रो च्या शेटफळ आणि हळगाव येथील युनिट च्या माध्यमातून घेत आहेत. तर माढा विधानसभा मतदारसंघातील ऊस गाळप करण्याची हमी तेथील उमेदवार अभिजित पाटील हे विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून घेत आहेत.

आगामी काळात गोयेगाव- आगोती हा उजनी जलाशय वर पुल उभा करणे.रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस निधी उपलब्ध करणे.छत्तीस गावातील बेंद ओढ्यास पाणी आणुन तेथील शेतकरी वर्गास बारा महिने पाणी उपलब्ध करणे.दहीगाव उपसा सिंचन योजनेची अपुरे असलेली कामे पूर्ण करणे.मतदार संघातील रेंगाळलेली रस्त्यांची प्रश्न,विजेची प्रश्न,उजनी धरणग्रस्तांचे प्रश्न, शेती पंपाच्या विजेचे प्रश्नासह विविध समस्या हे नारायण आबा पाटील हेच सोडवू शकतात.असा विश्वास जनतेत निर्माण झाला असून नारायण आबा पाटील हे नक्की आमदार म्हणून निवडून येतील असे वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page