सीना-कोळगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा शेतकऱ्यांना फायदा होणार- सरपंच पृथ्वीराज पाटील

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-
सीना-कोळगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून या पाच वर्षात ही योजना पूर्ण क्षमतेने चालवणार असल्याचे मत जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
काल दि. १८ मार्च रोजी सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाची सुरुवात युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य चंदूनाना अंबारे, नेरले माजी सरपंच पोपट बप्पा पाटील, बप्पा आतकरे, गणेश पाटील, सतीश रुपनर, तात्या तांबे, दत्ता डौले, जयराज कदम, धनंजय येवले, भाऊ पोळ, हरिभाऊ थोरे, भाऊ शिंदे, हरी शिंदे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की, आमदार नारायण आबा पाटील यांनी निवडणुकी पुर्वी या भागातील शेतकऱ्यांना आपण सीना कोळगाव उपसा सिंचन योजना सुरु करुन पूर्ण क्षमतेने चालवणार असा शब्द दिला होता. त्यानुसार आमदार महोदयांनी या योजने बाबत धाराशिव येथे पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवाज उठवला. या योजनेच्या मुख्य कालव्याच्या संबंधित अपुरी असलेली कामे लवकरच कायमस्वरूपी दुरुस्त केली जातील व पाणी गळती थांबवली जाईल.
ही योजना पूर्ण क्षमतेने चालवून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळवून. दिला जाईल असे ठाम आश्वासन पृथ्वीराज पाटील यांनी दिले, सतीश रुपनर यांनी उपस्थितांचे आभार मानले.