जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी काढलेल्या मोर्चाला आज एक वर्ष पूर्ण ; प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष


जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी गेल्यावर्षी २१ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात आला होता, आज जवळजवळ एक वर्ष पूर्ण झाली तरीही हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळालेला नाही.
आज बरोबर एक वर्षापूर्वी २१ फेब्रुवारीला जेऊर येथील स्टेशन मास्तर यांना हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले यावेळी सर्व पक्षीय तसेच विविध संघटनाकडून रेल्वे प्रवासनाला निवदेन देण्यात आले. दरम्यान जेऊर परिसरातील नागरिकांनी या मोर्चाला प्रचंड मोठा पाठिंबा दिला विविध संघटनाकडून निवेदने सादर करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या हुतात्मा एक्सप्रेस थांब्यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन आहे. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेऊरकरांचा अंत पाहत असून आता माघार नाही असा निर्धार काल जेऊर येथे बैठकीत करण्यात आला होता. दरम्यान आज जेऊर ग्रामपंचायत पासून रेल्वे स्टेशन पर्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला. जेऊर मधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते. करमाळा तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.










